साडेआठ लाख हेक्‍टरवर खानदेशात कापूस लागवड

कपाशी
कपाशी

जळगाव ः खानदेशात या हंगामात सुमारे आठ लाख ५९ हजार ९५६ हेक्‍टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. धुळे जिल्ह्यात १०५ टक्के, तर नंदुरबार जिल्ह्यात १२१ टक्के कापूस लागवड झाली आहे. जळगाव जिल्ह्यात चार लाख ९९ हजार ७३३ हजार हेक्‍टरवर लागवड झाली असून, कापूस लागवडीत जळगाव जिल्हा राज्यात क्रमांक एक असल्याची माहिती आहे.  या संदर्भात कृषी संस्थांनी एक अहवाल जारी केला आहे. त्यात जिल्हानिहाय आकडेवारी जारी केली आहे. कापूस लागवडीत जळगाव जिल्हा राज्यात मागील पाच वर्षे पहिल्या क्रमांकावर आहे. या हंगामातही पहिला क्रमांक जळगावने राखला आहे. पूर्वहंगामी कापूस लागवड खानदेशात मिळून एक लाख हेक्‍टरवर झाली आहे. तर सुमारे दोन लाख हेक्‍टर क्षेत्राला सिंचनासंबंधीचे संरक्षण असणार आहे. सरासरी पाऊस झाला आणि गिरणा, वाघूर, पांझरा आदी प्रकल्प भरले तर रब्बीत कापूस पिकाच्या सिंचनाला पाणी मिळेल. यामुळे कापसाचे उत्पादनही चांगले येईल, असा अंदाज तूर्त बांधला जात आहे. सद्यःस्थितीत कापूस पीक भीज व मध्यम पावसामुळे जोमात आहे. त्यात आंतरमशागतीचे काम एक-दोनदा झाले आहे. तसेच रासायनिक खते देण्याचे कामही अनेक भागात पूर्ण झाले आहे. कापूस पीक तापी, गिरणा व पांझरा नदीकाठी जोमात आहे. उत्तर महाराष्ट्रात सर्वांत कमी कापूस लागवड नाशिक जिल्ह्यात झाली आहे.  खानदेशातील कापूस लागवड (नाशिकसह) (क्षेत्र हेक्‍टरमध्ये)

जिल्हा   लागवड
जळगाव   ४,९९,७३३
धुळे   २,०३,५०७
नंदुरबार १,२१,६७६
नाशिक   ३४,०४० 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com