नगर : तुरीची हमीभावाने खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्रे सुरू झाली खरी; परंतु गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे ऊन पडत नाही. परिणामी, तुरीमधील ओलावा हटत नाही. त्याचा परिणाम थेट तूर खरेदीवर झाला आहे.
सरकारी नियमानुसार १२ टक्क्यांपर्यंत ओलावा असणे गरजेचे आहे. त्यामुळे चांगल्या उन्हात चार ते पाच दिवस तूर वाळवून ओलावा कमी करावा, असा शास्त्रज्ञांचा सल्ला आहे.
सध्या सरकारी खरेदी केंद्रावर विक्रीसाठी येत असलेल्या तुरीत थेट १८ टक्क्यांपर्यंत ओलावा दिसून येत आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये ११ खरेदी केंद्रांवर आत्तापर्यंत ९ हजार ३२ शेतकऱ्यांनी तूर विक्री करण्यासाठी नोंदणी केली. तरीही, आत्तापर्यंत फक्त पावणेदोनशे शेतकऱ्यांनीच तूर विक्री केली आहे.
जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून ५,८०० रुपये दराने तूर खरेदी होईल. जिल्ह्यात ११ केंद्रांवर ९०३२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. आत्तापर्यंत कर्जत केंद्रावर १२८ शेतकऱ्यांनी ८३४ क्विंटल, तर शेवगाव केंद्रावर ५१ शेतकऱ्यांनी ४९६ क्विंटल अशी १२३० क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.