रत्नागिरीत भातशेतीवर अस्मानी संकट

रत्नागिरी : ‘‘ऑक्टोबर महिन्यातील मुसळधार पावसामुळे भातशेतीवर अस्मानी संकट कोसळले आहे. अनेकांची भात पिके वाहून गेली. तर, आडव्या भाताला मोड आले आहेत.
 Crisis on paddy cultivation in Ratnagiri
Crisis on paddy cultivation in Ratnagiri

रत्नागिरी : ‘‘ऑक्टोबर महिन्यातील मुसळधार पावसामुळे भातशेतीवर अस्मानी संकट कोसळले आहे. अनेकांची भात पिके वाहून गेली. तर, आडव्या भाताला मोड आले आहेत. भात पावसात भिजल्याने मिळणाऱ्या तांदळाचा दर्जा घसरणार आहे. भात भरडल्यावर कणी, पिवळा तांदूळ हाती लागेल. गुरांना खाण्या योग्य पेंढाच राहिलेला नाही. हेक्टरी येणाऱ्‍या उत्पादनात १५ टक्के घट होईल’’, असा अंदाज भात संशोधकांनी व्यक्त केला.

जिल्ह्यात यंदा ६८ हजार हेक्टरवर भात, तर ९ हजार हेक्टरवर नाचणीची लागवड झाली आहे. यंदा भातशेतीला पूरक वातावरण राहिल्याने ती चांगली येईल,  असा अंदाज होता. कीडरोगाचाही प्रादुर्भाव आटोक्यात होता; मात्र ऑक्टोबरच्या सुरवातीपासूनच पावसाचे ग्रहण लागले. १० ऑक्टोबरपासून धुमाकूळच घातला. त्यात हळव्याची ६० टक्के, तर गरव्याची ३० टक्के कापणी सापडली आहे. अर्जुना, कोदवली, मुचकुंदी, काजळी, बावनदी, शास्त्री या नद्यांच्या किनाऱ्‍यावरील शेतीत पुराचे पाणी घुसले. 

जिल्ह्यात सुमारे ५ हजार हेक्टरपर्यंत शेतीचे नुकसान होईल, असा अंदाज आहे. त्यात सर्वाधिक नुकसान हे आडव्या झालेल्या भातावर पाऊस पडल्याने होत आहे. त्या भाताला पुन्हा कोंब आले आहेत. झोडले तरी त्यातून काहीच हाती लागणार नाही.

पावसामुळे अनेक ठिकाणी भात रुजले आहे. सध्या पाऊस थांबल्यामुळे कापणी सुरु झाली आहे. भिजलेला भात वाळवून झोडला पाहिजे. पाण्यात राहिलेल्या भाताच्या दर्जावर परिणाम होणार आहे. तो खाण्याच्या योग्यतेचा राहणार नाही. - डॉ. भरत वाघमोडे, भात संशोधक, शिरगा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com