सांगली : संख (ता.जत) येथील मध्यम प्रकल्पाच्या उजवा कालवा जाँकवेल नादुरुस्त झाला. त्यामुळे त्यातून पाणी गळती होऊन संख व भिवर्गी येथील १२ शेतकऱ्यांचे शेतात पाणी साचून १० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
पूर्व भागातील संख मध्यम प्रकल्प १९९५ मध्ये झाला आहे. अतिवृष्टीने प्रकल्प ११ वर्षानंतर तुडुंब भरला. जिल्ह्यात साठवण क्षमतेने दुसऱ्या क्रमांकाचा मध्यम प्रकल्प आहे. साठवण क्षमता ७०३ द.घ.ल.फू आहे. ओलिताखाली येणारे क्षेत्र ३ हजार २०० हेक्टर आहे.
मध्यम प्रकल्पातून डावा व उजवा कालवा काढण्यात आला आहे. त्यामध्ये उजवा कालवा १:७ कि.मी व डावा कालवा ३२ कि.मी आहे.मल्लिकार्जुन फुटाणे, शिवराज फुटाणे, राहुल फुटाणे, विठ्ठल फुटाणे, रखमाबाई बिराजदार, संगाप्पा फुटाणे, चंद्रशेखर फुटाणे, रावसाहेब मोकाशी, बसवराज फुटाणे, भाऊसाहेब फुटाणे, शिवण्णा वाघोली, विठ्ठल कलादगी यांच्या शेतामध्ये पाणी साचले आहे. तूर, बाजरी, मूग खरीप पिके व रब्बी हंगामातील ज्वारीचे मोठे नुकसान झाले आहे.
"नुकसानग्रस्त पिकांचा पंचनामा करून शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली." - मल्लिकार्जुन फुटाणे, शेतकरी, संख
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.