पुरामुळे संगमेश्वर तालुक्यातील नदीकाठच्या शेतीचे नुकसान

पुरामुळे संगमेश्वर तालुक्यातील नदीकाठच्या शेतीचे नुकसान
पुरामुळे संगमेश्वर तालुक्यातील नदीकाठच्या शेतीचे नुकसान

रत्नागिरी  ः मुसळधार पावसामुळे संगमेश्‍वर तालुक्यातील बावनदी, शास्त्री, सोनवी या नद्यांना सलग आठ दिवस पूर आला होता. यामुळे नदीकाठची हजारो एकर शेती बाधित झाली आहे. या प्रकाराला पंधरवडा उलटला तरी महसूल व कृषी विभागाने या नुकसानीकडे दुर्लक्ष केले आहे. लवकरच या शेतीचे सर्वेक्षण करून नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

संगमेश्‍वर तालुक्यात आलेल्या पुरामुळे नदीकाठची शेती सलग आठ दिवस पाण्याखाली होती. त्यामुळे हजारो एकरवरील भातपिकाचे नुकसान झाले आहे. मानसकोड, परचुरी, वांद्री, कुरधूंडा, शिवने, लोवले, फुणगूस, माखजन आदी गावांतील शेतीमध्ये चिखल साचला आहे. नदीकाठावरच्या या शेतीत नुकतीच भातलागवड झाली होती. आठ दिवस पाण्याखाली शेती गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 

काही भागांत रोपे वाहून गेली आहेत तर काही ठिकाणी चिखलामध्ये ती गाडून गेली आहे. पुरामुळे झालेल्या भातशेतीचे नुकसान होऊनही कृषी विभागाने कोणतीही खबरदारी घेत सर्वेक्षण केलेले नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. पुरामुळे झालेल्या भातशेतीच्या नुकसानीची शासनाकडून भरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात येत आहे. 

याबाबत शेतकरी दीपक जाधव म्हणाले, की भातशेती हा येथील शेतकऱ्यांचा वार्षिक उपजीविकेचा एकमात्र स्रोत आहे. यावर्षीच्या महापुराने हा स्रोतच उद्‌ध्वस्त केल्याने शेतकरी कुटुंबांवर उपासमारीची वेळ येणार आहे. यासाठी शासनाने कोकणाला झुकते माप देऊन गुंठ्याला किमान पाच हजारांची नुकसानभरपाई द्यावी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com