पीक नुकसानप्रश्नी शेतकरी संघर्ष समितीचा ठिय्या

परतीच्या मॉन्सून पावसामुळे, धरणातील पाणी सोडल्याने आलेल्या पुरामुळे आणि जलयुक्त शिवार योजनेच्या अशास्त्रीय कामामुळे पीक बुडी झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी, या मागणीसाठी मंगळवारी (ता. २७) शेतकरी संघर्ष समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
Crop damage issue of Farmers Struggle Committee
Crop damage issue of Farmers Struggle Committee

परभणी ः परतीच्या मॉन्सून पावसामुळे, धरणातील पाणी सोडल्याने आलेल्या पुरामुळे आणि जलयुक्त शिवार योजनेच्या अशास्त्रीय कामामुळे पीक बुडी झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी, या मागणीसाठी  मंगळवारी (ता. २७) शेतकरी संघर्ष समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

शेतकरी संघर्ष समितीचे संयोजक कॉ. राजन क्षीरसागर  यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनाच्या  वेळी परभणी जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळांचा बाधित व नुकसानग्रस्त क्षेत्रात समावेश करावा. राष्ट्रीय आपत्ती निवारण बल (NDRF)चे निकष शिथिल करून प्रतिहेक्टर विमा जोखीम रकमेची म्हणजे सोयाबीनसाठी ४५ हजार ५०० रुपये मदत द्यावी. माती वाहून गेलेल्या खड्डे पडलेल्या शेतजमिनीची दुरुस्ती करण्यासाठी ५० हजार अतिरिक्त मदत द्यावी.

चुकीच्या व अशास्त्रीय कार्यपद्धतीमुळे पूर आणि जमिनीच्या नुकसानीस जबाबदार अधिकारी कंत्राटदार आणि जलयुक्त शिवारचे जनक देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शंभर टक्के पीक विमा भरपाई तत्काळ अदा करावी, आदी मागण्या शेतकरी संघर्ष समितीतर्फे कॉ. क्षीरसागर, माणिक कदम, शिवाजी कदम यांनी केल्या. यावेळी शेतकरी सहभागी झाले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com