परभणी : ‘‘हवामान विभागाने रविवार (ता.२५) पर्यंत पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिके सुरक्षित ठिकाणी साठवावी. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. पीक नुकसानीबद्दल निश्चित मदत दिली जाईल,’’ अशी ग्वाही पालकमंत्री नवाब मलिक यांनी शुक्रवारी (ता.२३) दिली.
जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या हदगाव, ढेंगळी पिंपळगाव (ता.सेलू), कोल्हा (ता.मानवत) येथील पीक नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पीक नुकसानीचा आढावा घेतला.
मलिक म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील १ लाख ५८ हजार ३८६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यांवरून दिसून येत आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी १०८ कोटी १५ लाख रुपये निधीची मागणी केली. जमिनी खरडून गेल्याने अतोनात नुकसान झाले. काही शेतकरी निकषात न बसणारे आहेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन बलाच्या निकषानुसार शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाईल.’’
जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर उपस्थित होते.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.