नगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार हेक्टरवर प्रात्यक्षिक

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर   ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध योजनांमधून १५ हजार २१४ हेक्टर क्षेत्रावर यंदा रब्बी हंगामात पीक प्रात्यक्षिक घेण्याचे नियोजन आहे. या वर्षी दुष्काळी स्थितीमुळे पाणीटंचाई असली तरी पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणी नियोजन करून गहू, हरभऱ्याची पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

रब्बीत कृषी विभागाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान व एसएमएसपी योजनेतून दरवर्षी पीक प्रात्यक्षिक घेतले जाते. त्यात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना दहा वर्षांपेक्षा जुने असलेल्या वाणाला प्रतिकिलो ५० रुपये तर दहा वर्षांच्या आतील वाणाला २५ रुपये प्रतिकिलो अनुदान दिले जाणार आहे. जिल्ह्यात गव्हाची ९३०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली जाणार असून त्यासाठी ९३०० क्विंटल बियाणे वाटप केले जाणार आहे.

हरभऱ्याची साडेआठ हजार हेक्टरवर पेरणी केली जाणार असल्याने त्यासाठी ५९१४ क्विंटल बियाणे उपलब्ध करुन दिले जाणार आहे. हरभऱ्यासाठी एकरी ३० किलो, तर गव्हासाठी ४० किलो बियाणे अनुदानावर दिले जाईल. सध्या दुष्काळी परिस्थितीचा विचार करता बहुतांश भागात पाण्याची उपलब्धता नाही. त्याचा या पीक प्रात्यक्षिकांवर परिणाम होणार असल्याची प्रशासनाला जाणीव आहे. मात्र उपलब्ध पाण्यानुसार शक्य त्या शेतकऱ्यांनी पेरणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

असे आहे नियोजन

  • हरभरा क्षेत्र -  ८५०० हेक्टर
  • गहू क्षेत्र  - ९३०० हेक्टर
  • बियाणे रक्कम - १८ कोटी
  • अनुदान - ६ कोटी ४० लाख
  • शेतकरी हिस्सा - ११ कोटी ६० लाख
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com