विमा कंपन्यांची यंत्रणा पंचनामा करण्यासाठी तोकडी

पीक पंचनामे
पीक पंचनामे

अकोला ः खरिपात विमा उतरविलेल्या क्षेत्राचा आता नुकसान झाल्यानंतर पंचनामा करण्यासाठी विमा कंपन्यांकडे पुरेशी यंत्रणा नाही. त्यामुळे लाखो हेक्टरवरील खरीप पिकांच्या नुकसानीचा पंचनामा कसा व कोण करेल हा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. अशा स्थितीत शासनाकडून धोरणात्मक आदेश देण्याची मागणी केल्या जात आहे. खरिपात ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे, अशांना आता नुकसानभरपाई देण्याच्या उद्देशाने पिकाचा पंचनामा करावा लागेल, असे सांगितले जात आहे. परंतु, विमा कंपन्यांचे मनुष्यबळ अत्यंत कमी आहे. तालुक्याला केवळ एक सहायक नेमलेला आहे. प्रत्येक तालुक्यात नुकसानाचे क्षेत्र हजारो हेक्टर असल्याने हा एकटा सहायक कसा व कुठे सर्वेक्षण करणार हाच पेच आहे. ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर वऱ्हाडातील शेतकरी अतिवृष्टीने मोठ्या संकटात सापडला आहे. या नुकसानीची भरपाई कशी होईल, या चिंतेत शेतकरी असून, विमा काढलेले शेतकरी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी धावपळ करू लागले आहेत. तर ज्यांनी विमा काढलेला नाही, अशांना मदत कशी मिळेल, याबाबतही चिंता व्यक्त होऊ लागली. सध्या विमा भरलेले शेतकरी कंपनीला माहिती देण्याच्या उद्देशाने कुठे ऑनलाइन अर्ज दाखल करीत आहे, तर बहुतांश ठिकाणी कृषी कार्यालयात अर्ज देण्यासाठी रीघ लागलेली बघायला मिळत आहे. कृषी खात्याने आपल्या यंत्रणेला नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. कृषी सहायक, तलाठी, ग्रामसेवक आदींचे पथक हा सर्व्हे करणार आहे. कृषी विभागाने जिल्ह्यात बाधित झालेल्या क्षेत्राची अंदाजित आकडेवारी कृषी आयुक्तांना व शासनाला सादर केली आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com