बिगर कर्जदार शेतकरी पीकविम्यास पात्र

शेतकऱ्यांना पीकविम्याची नुकसानभरपाई मिळावी, यासाठी पाठपुरावा केला. ही मदत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर केली आहे. शेतकऱ्यांना पीकविम्याची नुकसानभरपाई देण्यास विलंब झाला आहे. पीकविम्याची नुकसान भरपाईसोबत त्याचे होणारे व्याजदेखील शासनाने शेतकऱ्यांना द्यावे. प्रत्यक्षात पीकविम्याची नुकसानभरपाई कधी मिळेल ते सांगता येत नसल्याने शेतकऱ्यांच्यात अनास्था निर्माण झाली आहेत. - धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद
बिगर कर्जदार शेतकरी पीकविम्यास पात्र
बिगर कर्जदार शेतकरी पीकविम्यास पात्र

सांगली  ः प्रधानमंत्री पीकविमा योजना खरीप २०१७ मध्ये राज्य शासनाच्या स्तरावर एक दिवसाची मुदतवाढ दिली होती. या कालावधीत लाभ घेतलेले शेतकरी नुकसानभरपाईस पात्र ठरले आहेत. त्या शेतकऱ्यांना ६९.४८ कोटी नुकसानभरपाई देण्याची प्रशासकीय मान्यता १ फेब्रुवारी देण्यात आली आहे. असा शासन निर्णय शासनाने जारी केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यास वाट मोकळी झाली आहे. ही रक्कम लवरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.   खरीप हंगाम २०१७ मध्ये ज्या बिगर कर्जदार शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभागी होता आले नव्हते, अशा शेतकऱ्यांना एक दिवसाची मुदत वाढ देऊन अर्ज भरले होते. या शेतकऱ्यांच्या पीक नुकसानभरपाई मिळाली नव्हती. त्यामुळे दैनिक ‘ॲग्रोवन`ने ४ सप्टेंबर २०१८ ला ‘पीकविमा भरपाई अडकली लाल फितीत’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध झाली होती. या बातमीची दखल घेत राज्यातील पीक नुकसानभरपाईस पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना ६९.४८ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता दिली आहे. सध्या राज्यात दुष्काळीची परिस्थिती गंभीर आहे. शेतकऱ्यांना ऐन दुष्काळात ही भरपाई मिळणार असल्याने शेतकऱ्यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, नुकसानभरपाई देण्यासाठी प्रशासकीय मान्यतेसाठी सहा महिन्यांचा कालावधी लावला. आता ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी किती कालावधी लावणार असा प्रश्न शेतकरी उपस्थित करू लागला आहेत. या प्रक्रियेला विलंब झाल्याने शेतकऱ्यांच्यात अनास्था निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर पीकविमा नुकसानभरपाई खात्यावर जमा करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. शासनाने काढलेल्या शासन निर्णयात असे म्हटले आहे, की प्रधानमंत्री पीकविमा योजना २०१७ मध्ये एक दिवसाची मुदत वाढवली होती. या एका दिवसाच्या कालावधीत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांपैकी नुकसानभरपाई पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना ६९.४८ कोटी नुकसानभरपाई देण्याची प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. नुकसानभरपाईस पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना अदा करावाच्या नुकसानभरपाईच्या रकमेची पडताळणी व प्रमाणीकरण करून सदर नुकसानभरपाई प्रचलित पद्धतीचा अवलंब करून जिल्हा स्तरावरून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत अदा करण्याची कार्यवाही आयुक्त (कृषी) यांनी करावी.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com