नगर : नैसर्गिक संकटाने तसेच अन्य कारणाने शेतपीकांचे नुकसान झाले तर नुकसान भरपाई मिळावी यासाठी राबवण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री पीकविमा योजनेत यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत शेतकरी सहभाग घटला आहे. खरीप व रब्बी हंगामात मिळून गेल्यावर्षी ७ लाख ३२ हजार ४८ शेतकऱ्यांनी ४ लाख ६१ हजार नऊशे ८७ हेक्टरवर विमा उतरवला होता. त्या तुलनेत यंदा शेतकरी संख्या दीड लाखाने घटली असून, १ लाख ३७ हजार १४ हेक्टरने क्षेत्रही घटले आहे.
विशेष म्हणजे वेगवेगळ्या कारणाने यंदा शेतीपिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. पीक विम्याची जनजागृती करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहभागी होण्याविषयीची कृषी विभागावर जबाबदारी आहे. येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने मागील वर्षभरात पीकविम्याबाबत गांभीर्याने घेतले नाही. त्याचा परिणाम शेतकरी सहभागावर झाल्याचे दिसत आहे.
अवेळी तसेच अतिपाऊस, गारपीट, यासह नैसर्गिक संकटाने शेतीपिकांचे नुकसान झाले तर शासनाला मदत द्यावी लागते. अनेक वेळा होणारे नुकसान मोठ्या प्रमाणात असल्याने मदत देण्याला अडचणी येतात. त्यामुळे शासनाने खरीप, रब्बी पिके, फळबागांसाठी प्रधानमंत्री पीकविमा योजना सुरू केली. गेल्या काही वर्षांपासून नगर जिल्ह्यात विम्यात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे यासाठी कृषी विभाग व लोकप्रतिनिधींकडून जनजागृती केल्याने शेतकऱ्यांचा सहभाग मोठा असे.
गेल्यावर्षभरात मात्र पिकविम्याबाबत येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयालाच गांभीर्य नसल्याचे दिसून आले आहे. पीकविम्याबाबत जनजागृतीही झाली नाही आणि शेतकरी संवादही झाला नाही. त्याचा परिणाम थेट सहभागावर असल्याचे आता दिसून आले आहे. नगरमध्ये कृषी विभागाच्या कामाबाबत शेतकऱ्यांत नाराजी आहे. योजनाही प्रभावीपणे राबवल्या जात नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.
पीकविम्याची स्थिती (कंसात गतवर्षीची स्थिती)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.