पुणे : पीकविमा योजनेत ४१ हजारांवर शेतकरी सहभागी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यासाठी खरीप हंगामात पंतप्रधान पीकविमा योजना राबविण्यात आली होती. या योजनेत ४१ हजार १३९ शेतकरी सहभागी झाले आहेत. योजनेतून २७ हजार ८४७ हेक्टरला संरक्षण मिळाले असून, नुकसान झाल्यानंतर कंपनीकडून ७७ कोटी २६ लाख २६ हजार रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे.  

यंदा जून-जुलै महिन्यात भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, तूर, मूग, उडीद, भूईमूग अशा विविध पिकांसाठी पंतप्रधान पीकविमा योजना राबविण्यात आली होती. शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ३० जुलैपर्यंत मुदत होती. मात्र, ग्रामीण भागात शेतकऱ्यांना आनलाइन अर्ज भरताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागल्याचे चित्र होते. शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरताना आलेल्या अडचणी आणि गेल्या वर्षीची कमी मिळालेली नुकसानभरपाईमुळे यामुळे या योजनेस कमी प्रतिसाद मिळाला आहे.

कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक स्वरूपाची होती. सर्व पिकांसाठी जोखीम स्तर सत्तर टक्के निश्चित करण्यात आला होता. शेतकऱ्यांना खरिपातील अन्नधान्य व गळीत धान्य पिकांकरिता फक्त दोन टक्के विमा हप्ता, नगदी पिकांकरिता पाच टक्के विमा हप्ता होता. योजनेअंतर्गत पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट, पीक पेरणीपू्र्व, लागवडीपूर्व नुकसान हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेले नुकसान, काढणी पश्चात नुकसान, स्थानिक नैसर्गिक आपत्ती या बाबींसाठी विमा संरक्षण देण्यात आले होते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com