सोलापूरातील अवघ्या ५० हजार शेतकऱ्यांना कर्जवाटप

ओटीएस पात्र खातेदारांनी पैसे भरल्याने कर्जवाटप जून-जुलै महिन्यात कर्जवाटप अधिक होते; परंतु ओटीएसला सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिल्याने दीड लाखावरील थकबाकीदारांकडून पैसे भरले जात नाहीत. त्यामुळे कर्जवाटप कमी झाले आहे. - अविनाश देशमुख, प्रशासक, जिल्हा मध्यवर्ती बॅंक, सोलापूर.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सोलापूर  : कर्जमाफीची प्रक्रिया गेल्या काही महिन्यांपासून ठप्प झाल्याने त्याचा परिणाम नव्या कर्जवाटपावर होत आहे. खरीप हंगामात जिल्ह्यातील दीड लाख शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्याचे उद्दिष्ट जिल्हा अग्रणी बॅंकेने सर्व बॅंकांना देऊनही आतापर्यंत फक्‍त ५० हजार शेतकऱ्यांनाच कर्ज मिळाले आहे.

गेल्या महिन्यापासून जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे कर्जवाटप मंदावले असून, जून-जुलैच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात बॅंकेने केवळ सहा कोटी रुपयांचेच कर्जवाटप केले आहे. वास्तविकपणे ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात ऊस लागवडीसाठी शेतकऱ्यांकडून कर्जाची मागणी मोठ्या प्रमाणावर होते; परंतु जिल्हा बॅंकेची आर्थिक परिस्थिती आणि राष्ट्रीयीकृत बॅंकांची उदासीनता या पेचात आता जिल्ह्यातील शेतकरी अडकल्याचे चित्र आहे. १३ जुलैपर्यंत जिल्हा बॅंकेने १७० कोटी रुपयांचे कर्जवाटप केले; परंतु त्यानंतर आतापर्यंत फक्‍त पाच कोटी रुपयांचेच कर्जवाटप केल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आले.

यंदाच्या खरीप हंगामात जिल्हा बॅंकेसह ग्रामीण, राष्ट्रीयीकृत व व्यापारी बॅंकांना जिल्हा अग्रणी बॅंकेकडून एक हजार ३८६ कोटी ८७ लाख रुपयांचे कर्ज जिल्ह्यातील एक लाख ५० हजार ५५० शेतकऱ्यांना वाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले; परंतु खरीप संपत आला तरीही आतापर्यंत फक्‍त ५४ हजार शेतकऱ्यांनाच कर्ज मिळाले आहे. आणखी तब्बल एक लाख शेतकरी कर्जाच्या प्रतीक्षेतच आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com