पीकविमा : मुदतवाढ मिळाली; पण अडचणी कायमच

मी १७ जुलैपासून दररोज पीकविम्याचा अर्ज भरण्यासाठी येत अाहे. नुकतीच माझी कागदपत्रे स्कॅन झाली आहेत. गुरुवारी सकाळी नऊ वाजेपासून केंद्रावर बसून आहे. पावती निघत नसल्याचे केंद्रचालक सांगतात. - गजानन देशमुख, उमरा, ता. मेहकर जि. बुलडाणा
सामूहीक सुविधा केंद्रावर अर्ज भरण्यासाठी बसलेले शेतकरी
सामूहीक सुविधा केंद्रावर अर्ज भरण्यासाठी बसलेले शेतकरी

बुलडाणा : या खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करण्यास शासनाने ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली; मात्र तांत्रिक अडचणी कायमच असल्याने शेतकऱ्यांचा त्रास तिळमात्र कमी झालेला नाही. जिल्ह्यांत पीकविम्याचे अर्ज भरण्याची प्रक्रिया संथ असून, काही ठिकाणी तर शेतकऱ्यांना अाठ ते दहा तास ताटकळत राहावे लागत अाहे. ही गती पाहता ३१ जुलैपर्यंत बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे अर्ज किती भरून होतील, याचे उत्तर मिळेनासे झाले अाहे.  जिल्ह्यात पीकविमा भरण्यासाठी सर्वच सामूहिक सुविधा केंद्रांवर सध्या गर्दी उसळलेली दिसत अाहे. हे अर्ज भरण्यासाठी पूर्वी २४ जुलै मुदत होती. त्याही वेळी अडचणी अाल्याने शिल्लक राहलेल्या शेतकऱ्यांची संख्या हजारो असल्याने मुदतवाढ देत ३१ जुलै करण्यात अाली. अाठ दिवसांचा हा कालावधी मिळाला खरा; परंतु अर्ज भरताना येणाऱ्या अडचणी होत्या, तशाच कायम अाहेत. पोर्टल सध्या काम करीत नाही. अर्ज अाॅनलाइन भरताना इतर माहितीसह अाधार क्रमांक द्यावा लागतो. अनेक शेतकऱ्यांचा हा क्रमांकच अाॅनलाइन व्हेरिफाय होत नाही. अाधार क्रमांक व्हेरिफाय झालाच तर बँक खाते चुकीचे असल्याचे दाखवते. हा टप्पा पार करून शेतकऱ्यांचा अर्ज सबमिट झालाच तर त्याची पावती मिळत नाही. पावतीसाठी तासनतास बसावे लागते. कधी कधी दुसऱ्या दिवशीसुद्धा जावे लागत आहे. सीएससी केंद्र चालकही या प्रकारांमुळे त्रस्त झाले अाहेत. पीकविम्याचे अर्ज भरावेत किंवा नाही अशा मानसिकतेत हे केंद्र चालक अाले अाहेत. अनेकांचे पैसे सर्व्हरमध्ये अडकल्याच्या घटना घडल्या. टोलवाटोलवीचे प्रकार अर्ज सबमिट होत नसल्याने सध्या यंत्रणांवरील ताण वाढू लागला आहे. तांत्रिक अडचणीबाबत शेतकरी संपर्क करीत असताना संबंधितांकडून उडवाउडवीचे उत्तरे दिली जात अाहेत. सुविधा केंद्रावर अर्ज भरताना येणाऱ्या अडचणीबाबत वरिष्ठांकडे विचारणा केली, तर अामची फक्त अर्ज भरून देण्याची जबाबदारी अाहे. केंद्रीय कृषी खात्याने लिंक दिलेली असून, त्यामध्ये अडचणी अाल्यास त्या पोचविण्याचे काम अाम्ही करतो. उर्वरित माहिती तुम्ही विमा कंपनीकडून किंवा जिल्हा अधीक्षकांकडून घ्या असे सांगतिले जाते. विमा कंपनीच्या प्रतिनिधींशी संपर्क साधण्याचे प्रयत्न केल्यास कधी नंबर बंद येतो, तर कधी अाउट अाॅफ कव्हरेज मिळतो. कृषी खात्याकडे अर्ज प्रक्रियेत येणाऱ्या तांत्रिक दोषाबाबत कुठलेही उत्तर नाही, अशा परिस्थितीने शेतकऱ्यांचा चेंडू केला अाहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com