कोंढाळी, जि. नागपूर : आता पीक आमचे आणि त्याचा भावही आम्हीच निश्चित करू. हे धोरण शेतकरी हितासाठी लागू करावे, अशी मागणी व शेतकऱ्यांसाठी हेच घोषवाक्य आहे, असे मत आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी येथे कार्यकर्ते व शेतकऱ्यांना संबोधित करताना व्यक्त केले. प्रवीण तोगडिया राष्ट्रीय बजरंग दल, राष्ट्रीय महिला परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या विनंतीवरून नागपूरहून अमरावतीला जात असताना कोंढाळी येथे मंगळवारी (ता. ७) पोहोचले. रिंगणाबोडी येथील सरपंच मंगलाताई काळबांडे यांच्या निवासस्थानी स्थानिक राष्ट्रीय बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी तोगडीयांचे गुलाब पुष्पवृष्टी करून भव्य स्वागत केले. या वेळी तोगडिया यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केले. येथील प्राचीन राम मंदिरात पोहोचल्यानंतर त्यांनी रामलल्लाचे दर्शन घेतले. तोगडिया म्हणाले, ‘‘अखंड भारताचा विचार घेऊन पुढे जाण्याची हीच वेळ आहे. रोजगारयुक्त तरुण, कर्जमुक्त शेतकरी असतील. प्रत्येक नागरिकाला आरोग्य आणि शिक्षण मिळेल, तरच समृद्ध देश झाला असे म्हणता येईल. शेतकऱ्यांना समृद्ध करायचे असल्यास सरकारने तातडीने शेतकऱ्यांसाठी हमीभाव कायदा लागू करण्यासाठी पावले उचलावीत. पंतप्रधानांनी शेतकरी कायदे मागे घेतले हे योग्यच झाले.’’
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.