जळगाव : पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना २०२०-२१ मधील नुकसानभरपाईची रक्कम किंवा परतावे अखेर मंजूर झाले आहेत. शेतकऱ्यांना हे परतावे दिवाळीपर्यंत मिळतील, असा दावा प्रशासन करीत आहे.
हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत २०२०-२१ अंतर्गत अंबिया बहारामध्ये जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. तापमान, अवकाळी पाऊस व जोरदार वादळामुळे नुकसानीसंबंधी विमा संरक्षण या योजनेतून मिळाले होते. ३१ जुलै २०२१ रोजी विमा संरक्षण कालावधी संपला होता. यानंतर ४५ दिवसात म्हणजेच सप्टेंबरच्या मध्यात परतावे पात्र शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित होते. पण, विमा कंपनीकडून पीकविम्याची मुदत संपली. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येत नव्हती. यावर खासदार उन्मेष पाटील, रक्षा खडसे यांनी जिल्हाधिकारी, पालकमंत्री, विमा कंपनी प्रतिनिधी, बँक अधिकारी व जिल्हा कृषी अधीक्षकांच्या उपस्थितीत अनेकवेळा बैठका घेऊन निर्देश दिले.
मुख्यमंत्री, कृषिमंत्री, कृषी सचिव व पालकमंत्र्यांना यांना पत्रव्यवहार केला. मात्र, केंद्र सरकारमुळे नुकसानभरपाई मिळण्यास विलंब होत असल्याचे सांगण्यात आले होते. त्यावेळी खासदार पाटील व रक्षा खडसे यांनी पाठपुरावा केला. खडसे यांनी लोकसभेत याबाबत प्रश्नही उपस्थित केला होता. राज्याचे मुखमंत्री, कृषिमंत्री व कृषी सचिवांना पत्रव्यवहार केला.
राज्य सरकारने तत्काळ राज्याचा हिस्सा देऊन शेतकऱ्यांना विम्याची रक्कम लवकरात लवकर मिळण्यासाठी कार्यवाही करावी, या बाबत खासदारांकडून पत्राद्वारे मागणी करण्यात आली होती.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.