कोल्हापुरात भात, सोयाबीन, भुईमुगाला पावसाचा फटका

सोयाबीनची कापणी केली होती. परंतु, आता मळणीच्या वेळी पाऊस आला. यामुळे मळणी चांगली झाली नाही. सोयाबीन चांगले येऊनही पावसाने माझे नुकसान झाले. - शिवाजी पाटील, हातकणंगले, जि. कोल्हापूर.
पावसामुळे भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे
पावसामुळे भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे

कोल्हापूर  : गेल्या चार दिवसांपासून पडणाऱ्या संततधार पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये कापणीला आलेला भात, सोयाबीन व भुईमूग शेंगांना फटका बसत आहे. अनेक ठिकाणी शेतांची तळी झाल्याने शेतीकामे ठप्प झाली आहेत. कृषी विभागाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून दुपारपासून पडणाऱ्या पावसाने शेतीकामांचे वेळापत्रक ठप्प झाले आहे. शेतात पाणी साचून राहिल्याने भात झोडपणी, सोयाबीनची काढणी, मळणी आदी कामे ठप्प आहेत. याच बरोबर भुईमुगाची काढणी रखडल्याने आता भुईमूग शेंगांचेही मोठे नुकसान होण्याची शक्‍यता आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे भुईमुगाचे उत्पादन कमी होण्याची शक्‍यता आहे. त्यातच आहे तो भुईमूग काढणेही शेतकऱ्यांना शक्‍य होत नसल्याचे चित्र आहे.

भाजीपाला उत्पादकांनाही दररोज पडणाऱ्या पावसाचा दणका बसला आहे. पाणी साचून राहात असल्याने भाजीपाला बाहेर काढणे अशक्‍य होत असल्याचे तो कुजून जात असल्याची स्थिती आहे.     

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com