खटाव तालुक्यात पावसामुळे पिकांचे नुकसान

परिसरात दररोज पाऊस पडत असल्याने घेवड्याचे पीक वाया गेलेच, पण नवीन कांद्याच्या गेल्या दहा दिवसांपूर्वी केलेली लागवडही वाया गेली. वाफ्यात साठलेल्या पाण्यामुळे रोपे कुजली. शासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी. - दादा बोबडे, शेतकरी, खटाव
पावसामुळे पिकांचे नुकसान
पावसामुळे पिकांचे नुकसान

खटाव, जि. सातारा  ः खटाव तालुक्‍यात या आठवड्यात झालेल्या सततच्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाणार, या भीतीने शेतकरी हतबल झाले आहेत. सततच्या पावसाने शेतात पाणी साचून अनेक भागातील घेवडा, वाटाणा, सोयाबीन, बटाटा, कांदा, आले ही प्रमुख पिके अक्षरशः कुजू लागली आहेत. परिणामी नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे. 

कायम दुष्काळाचा सामना करणारा तालुक्‍यातील शेतकरी आता ओल्या दुष्काळामुळे अडचणीत आला आहे. एकीकडे दमदार पावसामुळे नद्या, नाले, ओढे व सिंचन प्रकल्प तुडुंब भरले आहेत. तर दुसरीकडे सोयाबीन, घेवडा, बटाटा, भुईमूग, कांदा पिकांचे नुकसान झाले आहे. अनेकांची शेती पावसामुळे पाण्याखाली गेल्याने शेतात पाऊल टाकणे कठीण झाले आहे. 

अनेक ठिकाणी शेतीचे बांध पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाने पिकांसह व मातीसह वाहून गेले आहेत, तर खटाव येथील दादा बोबडे यांच्या शेतात काढायला आलेले भुईमूग पाण्याच्या प्रवाहाबरोबर माती आल्याने गाडले गेले. 

सध्या सुगीचे दिवस सुरू आहेत. हातातोंडाशी आलेला माल ताब्यात कसा घेता येईल, यासाठी शेतकरी कुटुंबांची पळापळ सुरू आहे. त्यात मजुरांचा तुटवडा जाणवत आहे. येत्या काही दिवसांत हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने पिकांचे मोठे नुकसान होईल, या कल्पनेनेच शेतकऱ्यांच्या पोटात भीतीचा गोळा उभा राहत आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com