गाळप हंगाम एक डिसेंबरपासून

सांगली, साताऱ्यातील पुरामुळे उसाचे झालेले मोठे नुकसान आणि त्यानंतर विधानसभा निवडणूक यामुळे हंगाम लांबला. आता अतिवृष्टीमुळेही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून नवे सरकार स्थापन झालेले नाही. त्यामुळे साधारणपणे १ डिसेंबरपासून यंदाचा गाळप हंगाम सुरू होईल. - दत्तात्रय गायकवाड, सहसंचालक, साखर
गाळप हंगाम
गाळप हंगाम

सोलापूर : नोव्हेंबरपासून यंदाचा गाळप हंगाम सुरू होईल, अशी आशा असतानाच अतिवृष्टीने राज्यातील बळिराजाचे कंबरडे मोडले. १७ जिल्ह्यांमधील शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दुसरीकडे नवे मंत्रिमंडळ स्थापनेचा मुहूर्त ठरलेला नसल्याने यंदाचा गाळप हंगाम १ डिसेंबरपासून सुरू होईल, असे संकेत साखर आयुक्‍तालयाने दिले आहेत.  यंदाच्या गाळप हंगामासाठी राज्यातील १६१ साखर कारखान्यांनी अर्ज केले आहेत. आता बहुतांश साखर कारखान्यांनी बॉयलर प्रतिपदीनही केले आहे मात्र, मंत्री समितीची बैठकच ठरली नसल्याने गाळप हंगामाचा मुहूर्त लांबणीवर पडला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा गाळपासाठी उसाचे क्षेत्र साडेपाच लाख हेक्‍टरने घटले आहे. आता ५.७० लाख हेक्‍टर ऊस गाळपासाठी शिल्लक आहे. साखरेचे उत्पादन घटणार असल्याने आगामी काळात साखर महाग होण्याचीही शक्‍यता वर्तविली जात आहे. तत्पूर्वी, दुष्काळ व महापुराने बाधित झालेला बळिराजा मदतीच्या वाटेत थांबला आहे. मात्र, अद्याप त्यांना मदत मिळालेली नाही. सत्तासंघर्षात मदत कधीपर्यंत मिळणार, याचा पेच अद्यापही कायम आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com