ओल्या दुष्काळासाठी ‘स्वाभिमानी’चा आक्रोश मोर्चा
ओल्या दुष्काळासाठी ‘स्वाभिमानी’चा आक्रोश मोर्चा

ओल्या दुष्काळासाठी ‘स्वाभिमानी’चा आक्रोश मोर्चा

परभणी : पावसामुळे परभणीसह राज्यातील अनेक जिल्ह्यांतील खरीप पिके, फळपिके, भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.त्यामुळे कोणतेही निकष न लावता ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बुधवारी (ता. ६) स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

सोयाबीन, कापूस, ज्वारी, बाजरी, तूर, मका या खरीप पिकांसह द्राक्ष, डाळिंब आदी फळपिके, भाजीपाला पिकांचे पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हाती आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या परिस्थितीत शेतकऱ्यांना सरसकट विमा परतावा, संपूर्ण कर्जमुक्ती देण्यात यावी. तत्काळ भरीव आर्थिक मदत करण्यात यावी, आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

वस्त्रोउद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, प्रदेशाध्यक्ष डाॅ. प्रकाश पोपळे, महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा रसिका ढगे, जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, भगवान शिंदे, केशव आरमळ, डिंगाबर पवार, भास्कर खटिंग, शेख जाफर, अनंत चव्हाण, मुंजाभाऊ लोडे, हनुमान मसलकर, माऊली लंगोटे, बाळासाहेब आळने, मंचक सोळंके आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांना मागण्यांचे निवदेन देण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com