ताकारी योजनेचे आवर्तन लांबणार

लाभ क्षेत्राला पाण्याची अंत्यंत गरज आहे. त्यामुळे पाणी तत्काळ सोडण्याचे नियोजन केले आहे. कालव्याचे दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. लवकरच काम पूर्ण होऊन पाणी सोडण्यात कोणतीही अडचण येणार नाही. - संजय पाटील,शाखा अभियंता, ताकारी योजना.
The cycle of Takari scheme will be extended
The cycle of Takari scheme will be extended

सांगली  ः ‘‘ताकारी उपसा सिंचन योजनेच्या मुख्य कालव्याला अडीच किलोमीटर अंतरावर मोठे भगदाड पडले. त्यामुळे योजनेचे रविवारी (ता. १०) सुरु होणारे आवर्तन लांबणार आहे. मुख्य कालव्याच्या दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. ते लवकरच पूर्ण होईल’’, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली. 

ताकारी योजनचे तब्बल ५६ दिवस दुसरे आवर्तन सुरु होते. दोन मे रोजी आवर्तन बंद केले होते. पंपगृहातील पंपाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण केले होते. तिसरे आवर्तन रविवारी (ता. १०) मे रोजी सोडण्याचे नियोजन सुरु होते. दरम्यान, देवराष्ट्रे येथे ताकारी योजनेचा २० वर्षापूर्वी बांधण्यात आलेला आबे हा कालवा योजनेच्या प्रारंभापासून अवघ्या अडीच किलोमीवर आहे. या देवराष्ट्रे येथील मुख्य कालव्याची एका बाजूची भिंत कोसळली आहे.

पाटबंधारे विभागाकडून मुख्य कालव्याची भिंत उभारण्याचे काम सुरु आहे. कालव्याची दुरुस्ती झाल्याशिवाय आवर्तन सोडणे कठीण आहे. त्यामुळे लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com