बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ सक्रिय;थंडी वाढणार

बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढत असून, त्याचे रूपांतर चक्रीवादळामध्ये झाले आहे. हे वादळ उत्तरेकडून बाष्प खेचणार असल्याने राज्यातील काही भागांत पुन्हा काही प्रमाणात गारठा वाढणार
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ सक्रिय;थंडी वाढणार
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ सक्रिय;थंडी वाढणार

पुणे : बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढत असून, त्याचे रूपांतर चक्रीवादळामध्ये झाले आहे. हे वादळ उत्तरेकडून बाष्प खेचणार असल्याने राज्यातील काही भागांत पुन्हा काही प्रमाणात गारठा वाढणार असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

दक्षिण बंगालचा उपसागरात असलेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचे मंगळवारी (ता. १) सायंकाळी चक्रीवादळ तयार झाले आहे. ते श्रीलंकेतील त्रिकोमालीपासून पूर्व दक्षिण पूर्व भागात ५३० किलोमीटर अंतरावर होते. तर कन्याकुमारीपासून पूर्व दक्षिण पूर्व भागात ९३० किलोमीटर अंतरावर होते. आज (ता. २) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत जाऊन पश्‍चिम वायव्य भागाकडील तमिळनाडूकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज (बुधवारी) आणि  उद्या (गुरुवारी) ते वादळ कोमोरिन परिसरातून पश्‍चिमेकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शुक्रवारपर्यत (ता. ४) दक्षिण तमिळनाडू, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेशाची किनारपट्टी, माहे आणि कराईकल आणि दक्षिण उत्तर केरळ या भागांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच अरबी समुद्राच्या पूर्व मध्य भाग व महाराष्ट्राची किनारपट्टीदरम्यान चक्रीय वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे.  

उत्तर भारतात थंडीची लाटेने चांगलीच हुडहुडी भरली आहे. यामुळे पश्‍चिम राजस्थान भागातील चुरू येथे ५.५ अंश सेल्सिअसची देशातील किमान तापमानाची नोंद झाली आहे. इतर हरियाना, चंडीगड, दिल्ली, राजस्थान या भागांत सरासरीच्या तुलनेत १ ते ३ अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे. त्यामुळे या भागात कडाक्याची थंडी असून, राज्यातही काही भागांतही थंड वारे वाहत आहेत. त्यामुळे सकाळी काही प्रमाणात गारठा वाढला आहे. मंगळवारी (ता.१) सकाळपर्यंत विविध शहरांतील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान, अंश सेल्सिअसमध्ये ः मुंबई (सांताक्रूझ) २४.४ (२), ठाणे २५, अलिबाग २३.४ (४), रत्नागिरी २४ (३), डहाणू २३.८ (२), पुणे १८.२ (५), जळगाव २०.२ (७), कोल्हापूर २०.५ (४), महाबळेश्‍वर १६.६ (३), मालेगाव १९.४ (७), नाशिक १७.८ (६), निफाड १७.२, सांगली १९.३ (३), सातारा १८.४ (३), सोलापूर १८.९ (२), औरंगाबाद १८.० (५), परभणी १६ (१), परभणी कृषी विद्यापीठ १५, नांदेड १९.० (५), उस्मानाबाद २०.४ (६), अकोला १८.४ (३), अमरावती १४.९ (-१), बुलडाणा १७.८ (२),चंद्रपूर १८ (४), गोंदिया १३.२, नागपूर १५.९ (२), वर्धा १६.२ (२), यवतमाळ १७ (२) मराठवाडा व विदर्भात गारठा वाढला ः राज्यात हवामान कोरडे झाले असले, तरी बंगालच्या उपसागरातील अति तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम राज्यातील वातावरणावर होऊ लागला आहे. मराठवाडा व विदर्भात काही प्रमाणात गारठा वाढू लागला आहे. मंगळवारी (ता. १) सकाळी आठ वाजेपर्यंत गोंदिया येथे १३.२ अंश सेल्सिअसची किमान तापमानाची नोंद झाली. तर मराठवाड्यातील परभणी कृषी विद्यापीठ येथे १५ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले. मध्य महाराष्ट्र व कोकणात थंडी अजूनही गायब असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com