सिंधुदुर्ग: खवळलेल्या समुद्राचा किनारपट्टीला तडाखा

पेरणी
पेरणी

सिंधुदुर्ग: वादळी वारा आणि खवळलेल्या समुद्राचा किनारपट्टीला तडाखा बसला. सर्वाधिक फटका मालवण देवबाग परिसराला बसला असून येथील अनेक घरांत समुद्राचे पाणी घुसले. वेंगुर्ले किनारपट्टीत वादळामुळे झाडे उन्मळून पडण्याचे प्रकार घडले आहेत. मांडवी खाडीत पाणी भरल्यामुळे तेथे ठेवण्यात आलेल्या होड्या सुरक्षित स्थळी हलविताना मच्छीमार बांधवांची तारांबळ उडाली. जिल्ह्यात सर्वत्र वाऱ्यांसह पावसाचा जोर वाढला आहे. चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला सुरवात केली आहे. जिल्ह्याच्या किनारपट्टीला मंगळवारी सायंकाळी समुद्राच्या महाकाय लाटा आणि वादळी वाऱ्याचा फटाक बसला. वाऱ्याचा वेग प्रचंड असल्यामुळे किनारपट्टी भागात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून आणि मोडून पडण्याच्या घटना घडल्या. खवळलेल्या समुद्राचा सर्वाधिक फटका मालवण देवबाग परिसराला बसला. देवबाग ख्रिश्‍चनवाडीतील दोन घरांमध्ये समुद्राचे पाणी घुसले, त्यामुळे तेथील रहिवाशांना स्थंलातरीत करावे लागले. आनंद कुमठेकर यांच्या होडीचे मोठे नुकसान झाले आहे. मालवणप्रमाणेच वेंगुर्ल्यालाही वादळी वाऱ्याने झोडपून काढले. मांडवी खाडीत नांगरूण होड्या ठेवण्यात आल्या होत्या. परंतु पाणी वाढल्यामुळे मच्छीमारांची चांगलीच तारांबळ उडाली. दाभोली मोबारवाडी येथे मच्छीमारांच्या घरांपर्यंत समुद्री लाटांचे पाणी पोचल्यामुळे त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे. बहुतांशी पेरणीयोग्य पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरवात केलीआहे. सिंधुदुर्गातही वादळी पाऊस अरबी समुद्रात घोंगावणाऱ्या वायू चक्रीवादळाचा परिणाम कोकण किनारपट्टीवरही जाणवला. मंगळवारी (ता. ११) दुपारी अचानक वारे वाहू लागले आणि हलका पाऊसही झाला. वेगवान वाहणाऱ्या वाऱ्यामुळे किनारपट्टीवरील लोकांची धावपळ झाली. रात्रभर पावसाची रिपरिप सुरू होती. बुधवारी (ता. १२) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी १०.३३ मिलिमीटर पाऊस झाला. त्यात दापोली १५, गुहागर ९.००, संगमेश्वर ८, रत्नागिरी १४, लांजा १४, राजापूर २३ मिमीची नोंद झाली आहे. मंडणगड, चिपळूण, खेड तालुक्यांत निरंक नोंद आहे. वादळामुळे मॉन्सून लांबेल असा अंदाज वर्तविला जात आहे. वायू चक्रीवादळाचा अंदाज आल्यानंतर महाराष्ट्रातील किनारपट्टीवरील मच्छीमारांना दोन दिवस मासेमारीसाठी जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे. मंगळवारी दुपारपासून वेगवान वाऱ्यामुळे समुद्र खवळला होता. वऱ्यांमुळे रत्नागिरी शहरात खारेघाट रोडवर आंब्याचे भलेमोठे झाड रस्त्यावर कोसळले. रस्त्यावर उभ्या असलेल्या चारचाकी गाडीवरच झाड कोसळल्याने त्याचे नुकसान झाले. वादळाचा सर्वाधिक फटका किनारी भागात बसला. सुट्यांमुळे अजूनही गणपतीपुळेत पर्यटकांची गर्दी आहे. किनाऱ्यावरील शहाळी विकणाऱ्यांसह अन्य विक्रेत्यांच्या झोपड्या वाऱ्यामुळे उडाल्या. रत्नागिरी शहरातील मांडवी जेटीवर फुटणाऱ्या लाटांमध्ये भिजण्यासाठी तरुण-तरुणी धाव घेत होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com