कडवा कालव्यासाठी धरणातून आवर्तन साेडले

कडवा धरणातून सिंचन आणि बिगरसिंचनासाठी ८५० दशलक्ष घनफूट पाणी कडवा कालव्याला सोडण्यात आले. हे आवर्तन साधारणत: २६ ते २७ दिवस सुरू राहील. उर्वरित जलसाठा आरक्षित असल्याने सोडण्यात येणार आहे. ७५ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. क्षमता लक्षात घेता अखेरपर्यंत ३५० क्युसेकपर्यंत विसर्ग होऊ शकतो. - शरद गायधनी, मुख्य कार्यकारी अभियंता दुष्काळी स्थितीमुळे विहिरींनी तळ गाठला होता. खरीप हंगामातील पिके तर वाया गेलीच, रब्बी हंगामातील पिकेही पाण्याअभावी करपून चालली होती. फळबागा वाचवणे जिकिरीचे होऊन बसले होते. कालव्याला पाणी आल्याने मोठा आधार मिळाला. - भाऊसाहेब कमानकर, शेतकरी पाण्याचे महत्त्व समजू लागले आहे. कडवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी पाणीवापर संस्था स्थापन केली पाहिजे. म्हणजे भविष्यात मागणी वाढेल आणि पाणी आरक्षित होईल. यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. शेतकऱ्यांनी भेंडाळी येथे ग्रामपंचायत कार्यालयात संपर्क साधावा. - गोरख खालकर, भेंडाळी
कडवा कालव्यासाठी धरणातून आवर्तन साेडले
कडवा कालव्यासाठी धरणातून आवर्तन साेडले

सायखेडा, जि. नाशिक : निफाड तालुक्यातील दक्षिणेकडील काही गावे आणि सिन्नर तालुक्याच्या पूर्वेकडील दुष्काळग्रस्त गावांना वरदान ठरलेल्या कडवा कालव्याला १ डिसेंबरपासून २६ ते २७ दिवसांचे आवर्तन सोडण्यात आले. त्यामुळे १७०० हेक्टरवरील रब्बी पिकांना दिलासा मिळाला.

कडवा धरणात सध्या १३५० दशलक्ष घनफूट जलसाठा शिल्लक आहे. त्याची क्षमता १६८० दशलक्ष घनफूट आहे. ८५० दशलक्ष घनफूट पाणी सिंचन आणि बिगरसिंचनासाठी वापरण्यात येणार आहे, तर उर्वरित जलसाठा दुष्काळी स्थितीमुळे पिण्यासाठी आरक्षित करण्यात आला आहे. कालव्याला सुरवातीला २७५ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. अखेरपर्यंत ३५० क्युसेकपर्यंत विसर्ग सोडण्यात येणार आहे. ८८ किलोमीटर लांबीच्या कडवा कालवा क्षेत्रातील २६ गावांना याचा फायदा होईल, अशी माहिती कार्यकारी अभियंता शरद गायधनी यांनी दिली.

पावसाच्या कमी प्रमाणामुळे कडवा कालवा परिक्षेत्रातील विहिरींनी पावसाळ्यातच तळ गाठला. खरीप हंगामातील पिकेदेखील करपून गेली. सोयाबीन, मका, ऊस, कांदे या नगदी पिकांना पाणी नसल्याने भांडवली खर्चसुद्धा पाण्यात गेला. थोड्याफार प्रमाणात असलेल्या फळबागा वाचविण्यासाठी आणि रब्बी हंगामातील हरभरा, गहू, उन्हाळी कांद्यासाठी कालव्याला पाणी सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केल होती. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत आमदार अनिल कदम यांनीही या मागणीचा पाठपुरावा केला. त्यानुसार आवर्तन सोडण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com