साताऱ्यातील प्रमुख धरणांत ९० टक्क्यांवर पाणीसाठा

तारळी धरणातून विसर्ग
तारळी धरणातून विसर्ग

सातारा  ः जिल्ह्यातील प्रमुख धरणांत ९० टक्क्यांवर पाणीसाठा झाला आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर असल्याने कोयना, धोम, कण्हेर, उरमोडी, तारळी व धोम-बलकवडी या धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे.

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सोमवारी पावसाचा जोर कमी झाल्याने तीन वेळा दरवाजे खाली घेत सायंकाळी सहा वाजता दरवाजे दोन फुटांवर स्थिर करण्यात आले होते. मात्र, पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने मंगळवारी सायंकाळी धरणाचे दरवाजे तीन फुटांपर्यंत उचलण्यात आले होते. यातून ३६ हजार ६४२ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात होता.

यानंतरही पावसाचा जोर कायम असल्याने धरण व्यवस्थापनाकडून बुधवारी सकाळी नऊ वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे तीन फुटावरून पाच फुटांवर उचलण्यात आले आहेत. या दरवाजातून ४२ हजार ७५३ व पायथा वीज गृहातून २१०० असे एकुण ४४ हजार ८५३ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या धरणात प्रतिसेंकद ३६ हजार ६४२ क्युसेक पाण्याची आवक होत आहे.  

इतर प्रमुख धरणांमधूनही विसर्ग सुरू आहे. यामध्ये धोममधून ३४२४, कण्हेर धरणातून २८०६, उरमोडी धरणातून ४५०, तारळी धरणातून १७६८, धोम-बलकवडी धरणातून २२७९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या पाण्याच्या विसर्गामुळे कृष्णा, कोयना, वेण्णा, उरमोडी या नद्यांच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.  

जिल्ह्यातील प्रमुख धरणातील पाणीसाठा (टीएमसी)
धरण पाणीसाठा
कोयना  १०२.९८
धोम  १२.७२
कण्हेर ९.४४
उरमोडी ९.७८
तारळी   ५.५९
बलकवडी  ३.९८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com