भात, नागली पिकांचे ११ हजार हेक्टरवर नुकसान

भात, नागली पिकांचे ११ हजार हेक्टरवर नुकसान
भात, नागली पिकांचे ११ हजार हेक्टरवर नुकसान

रत्नागिरी ः क्यार वादळाच्या प्रभावामुळे झालेल्या अतिवृष्टीने रत्नागिरी जिल्ह्यातील भात, नागली पिकांच्या नुकसानीचा आकडा २६ कोटी ७५ लाखावर पोचला आहे. ७९ हजार १४५ हेक्टरपैकी ११ हजार ७०६ हेक्टरचे नुकसान झाले आहे, अशी माहिती प्रशासनाकडे सादर केलेल्या नुकसानीच्या पंचनाम्यातून मिळाली. 

क्यार वादळमुळे सलग दहा दिवस कोकण किनारपट्टीसह संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस झाला. गरवे, निमगरव्याची कापणी रखडल्यामुळे भातकापणी अतिवृष्टीत सापडली. भात भिजल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाकडून दिलेल्या आकडेवारीवरून ५३ हजार ९३७ शेतकऱ्यांचे ११ हजार ७०६ हेक्टरचे नुकसान झाले आहे. पंचनामे पूर्ण झाले असून शासनाकडे अहवाल सादर करण्यात आला आहे. प्राप्त अहवालानुसार काढणीपश्‍चात नुकसान झालेले शेतकरी १५,९८० इतके आहेत. त्यांच्या ३,२३० हेक्टरचे नुकसान झाले असून ३७,९५७ शेतकऱ्यांच्या मळ्यातील उभ्या पिकांना फटका बसला ते क्षेत्र ८,४७५ हेक्टर आहे. 

पंचनामे पूर्ण झालेल्या क्षेत्रापैकी विमासंरक्षित ३०५ शेतकऱ्यांच्या १४०.८५ हेक्टरची नोंद झाली आहे. पावसामुळे भातशेतीसोबत पेंढ्याचेही नुकसान झाले आहे. अचानक पडलेल्या पावसामुळे शेतातील कापलेले भात ओले होऊन कुजले. काही ठिकाणच्या सखल भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने शेतात पाणी साचून राहिले असल्याने भाताचा पेंढाही कुजला. मळणीसाठी तयार केलेल्या उडव्यांमध्ये पाणी शिरल्याने तोही पेंढा कुजला आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला असून हातच्या पिकाचे नुकसान होण्याबरोबरच पेंढ्याचेही नुकसान होत असल्याने गुरांवर उपासमारीची वेळ येणार आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com