सांगली जिल्ह्यात महापुरामुळे ६६ हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान

सांगली जिल्ह्यात महापुरामुळे ६६ हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान
सांगली जिल्ह्यात महापुरामुळे ६६ हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान

सांगली : जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे ६६०९८ हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यापैकी २१७६७ हेक्‍टर म्हणजेच ३३ टक्के क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाले आहेत. पंचनामे तातडीने पूर्ण करण्यासाठी ग्रामीण भागातील तलाठ्यांची यंत्रणा ताकदीने कामाला लावण्याची गरज आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पंचनामे कधी पूर्ण होणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. 

जिल्ह्यातील मिरज, वाळवा, पलूस, शिराळा या चार तालुक्‍यात पावसाने थैमान घातले. कृष्णा आणि वारणा नदीतील पाणी पात्राबाहेर येऊन शेतात घुसले. तर तासगाव तालुक्‍यातील चार गावात अतिवृष्टी झाली. त्याचबरोबर येरळा नदीचे पाणी शेतात आले. यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सहा तालुक्‍यातील २३५ गावातील १ लाख २० हजार २३१ शेतकऱ्यांच्या  ६६ हजार ०९८ हेक्‍टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. मिरज, पलूस शिराळा आणि वाळवा या चार तालुक्‍यात पिकांना मोठा फटका बसला असून या चार तालुक्‍यातील ६५ हजार ३४४ हेक्‍टरवरील पिके बाधित झाली आहेत.

कृषी विभागाने गेल्या चार दिवसापासून पंचनामे करण्यास सुरवात केली आहे. आत्तापर्यंत २१ हजार ७६७ हेक्‍टरवरील पंचनामे झाले आहेत. परंतू पंचनामे करण्यासाठी पुरेसे बळ नसल्याने पंचनामे लवकर होणार नसल्याची शक्‍यता आहे.

गेल्या दोन दिवसापूर्वी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे सांगली जिल्ह्यातील पीक स्थिती पाहण्यासाठी आले होते. दरम्यान, त्यांनी एका दिवसात पिकांचे पंचनामे करावेत, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र, अद्यापही पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळे लवकारत लवकर पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com