नगर जिल्ह्यात पिकांचे ६३ हजार हेक्टरवर नुकसान

​ नगरः सप्टेंबर महिन्यातील सलगच्या २० दिवसांच्या पावसाने जिल्ह्यात तब्बल ६३ हजार ८०७ हेक्टरवर नुकसान झाले आहे. तसा अंतिम अहवाल प्रशासनाने तयार केला आहे. १ लाख १६ हजार शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे.
Damage to crops on 63 thousand hectares in Nagar district
Damage to crops on 63 thousand hectares in Nagar district

नगरः सप्टेंबर महिन्यातील सलगच्या २० दिवसांच्या पावसाने जिल्ह्यात तब्बल ६३ हजार ८०७ हेक्टरवर नुकसान झाले आहे. तसा अंतिम अहवाल प्रशासनाने तयार केला आहे. १ लाख १६ हजार शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. 

सरकारी निकषानुसार या नुकसानीची भरपाई देण्यासाठी ५८ कोटी ९० लाख रुपये अपेक्षित असल्याचे अहवालात नमूद केले आहे. या महिन्यातही साधारण साठ हजार हेक्टरवर नुकसान झाल्याचा अंदाज आहे. कर्जत, जामखेड आणि अकोले तालुक्यात सप्टेंबर महिन्यात एकाही शेतकऱ्यांचे नुकसान झाले नाही, असे अहवालात स्पष्ट केले आहे. 

जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात सतत वीस दिवस झालेल्या पावसामुळे खरिपातील सोयाबीन, बाजरी, मका, तूर, भुईमूग, कापसाचे मोठे नुकसान झाले. फळपीके व भाजीपाल्यालाही मोठा फटका बसला आहे. प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यानंतर सप्टेंबरमधील अंतिम नुकसानीचा अहवाल तयार केला आहे. 

सरकारी नियमानुसार जिरायती क्षेत्रासाठी हेक्टरी ६ हजार ८००, बागायती क्षेत्रासाठी १३ हजार ५०० व फळबागांसाठी १८ हजार रुपये हेक्टरी मदत देण्यासाठी ५८ कोटी ९० लाखाची गरज आहे, असे अहवालात नमूद केले आहे. 

सप्टेंबरमध्ये सर्वाधिक फटका राहुरी, शेवगाव तालुक्याला बसला. येथे १६ हजार ९४१, तर राहुरी तालुक्यात १९ हजार ८५३ हेक्टर क्षेत्र बाधित आहे. कर्जत, जामखेड आणि अकोले तालुक्यात सप्टेंबरमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले नाही, असे अहवालात स्पष्ट केले आहे. या महिन्यातही शेवगाव, पाथर्डीलाच अधिक फटका आहे. श्रीगोंदा, नगरला नुकसान अल्प आहे. 

अनेक ठिकाणी नाहीत पंचनामे  

अतिवृष्टीची (२४ तासात ६५ मिलिमीटर पाऊस) नोंद झालेल्या महसूल मंडळांतच पंचनामे केले जात आहेत. शब्दाचा खेळ करत अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी पंचनामे केले जात असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, अनेक भागात पावसाने नुकसान होऊनही केवळ अतिवृष्टीची नोंद नसल्याच्या कारणाने अनेक ठिकाणी पंचनामे झालेच नाहीत.

शिवाय ३३ टक्क्‍यापेक्षा कमी नुकसान ग्रहित धरले गेले नाही. त्यामुळे नुकसानीचे क्षेत्र ८० हजार हेक्टरच्या जवळपास असल्याचे शेतकरी सांगत आहेत. विशेष म्हणजे या मुद्यावर शेतकरी नेते, पदाधिकारी गप्प आहेत. 

असे आहे नुकसान

एकूण नुकसान ६३ हजार ८०७ हेक्टर
बाधित गावे ३८७ 
नुकसानग्रस्त शेतकरी १ लाख १६ हजार ६३८
जिरायती क्षेत्र ४० हजार ८२३ हेक्टर
बागायत क्षेत्र २२ हजार ८५५ हेक्टर
फळपिकांचे क्षेत्र १२८  ः हेक्टर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com