जळगाव जिल्ह्यात अतिपावसाने पिकांचे नुकसान 

जळगाव जिल्ह्यात अतिपावसाने पिकांचे नुकसान
जळगाव जिल्ह्यात अतिपावसाने पिकांचे नुकसान

जळगाव ः जिल्ह्यात परतीच्या पावसाने सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. उडीद, मुगाचे उत्पादन तर हातचे गेले आहे. मका पीक अमेरिकन लष्करी अळीने केव्हाच नष्ट केले आहे. कपाशी हे मुख्य पीक असल्याने परतीच्या पावसाचा जोर अधिक आहे. यामुळे कपाशीला लागलेली बोंडे झडत आहे. काही ठिकाणी बोंडे फुटून त्यावर पाऊस झाल्याने कपाशीचेही नुकसान झाले आहे. अद्यापही अनेक शेतांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. 

कृषी विभागातर्फे पंचनामे तेव्हाच केले जातात,, जेव्हा ३३ टक्क्यांपेक्षा अधिक पिकांचे नुकसान होते. सप्टेंबरअखेरपर्यंत सुमारे साडेपाच हजार हेक्‍टरवर ३३ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. या उडीद, मुगासह सर्वच पिकांचा समावेश आहे. तसा अहवाल कृषी विभागाने शासनाकडे पाठविला आहे. 

सध्या सुरू असलेला पाऊस धोकादायक आहे. त्यावर उपाय म्हणजे शेतकऱ्यांनी शेतात पाणी साचू न देणे होता. पाऊस झाला तरी त्याचा निचरा लागलीच होणे गरजेचे असल्याचे कृषी विभागाने सांगितले. जिल्ह्यात आतापर्यंत १२० टक्के पाऊस झाला. आता पाऊस अति होत असल्याने शेतातील पिकांचे नुकसान होत आहे. पावसाची उघडीप पडली तर पिके परिपक्व होतील. 

जिल्ह्यात खरिपाचा पेरा ७ लाख ५० हजार हेक्‍टरवर झाला आहे. मात्र, पावसामुळे साडेपाच हजार हेक्‍टरवरील पिकांचे ३३ टक्‍क्‍यांवर नुकसान झाले आहे. उडीद, मूग हातचा गेला आहे. कपाशीला चांगली बोंडे फुटली आहे. मात्र, अति पावसाने बोंडे सडत आहे. या परिस्थितीत कपाशीचे उत्पादन अधिक येण्याची शक्‍यता कमीच आहे. बोंडे सडू नयेत यासाठी शेतकऱ्यांनी शेतात साचलेले पाणी काढून टाकण्यासाठी उपाय योजना केल्यातरच कपाशीचे पिके टिकतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com