नाशिक : चालू वर्षी पाऊस अधिक झाल्याने पुणेगाव कालव्यातून पूरपाणी सोडण्यात आले आहे. या पाण्याचा कालव्यातून विसर्ग होत असताना मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असल्याने कालव्याच्या बाजूला असणाऱ्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान होत आहे. या निकृष्ट कामामुळे आमचे नुकसान होत असल्याचा आरोप येथील असलेल्या शेतकऱ्यांनी केला. त्याचा पिंपळणारे व परिसरातील शेतकऱ्यांना फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांनी या पाणीगळतीला कंटाळून यापूर्वी द्राक्षबाग तोडल्या आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पीकपद्धतीमध्ये बदल करून टोमॅटो, मका यांसारखी पिके घ्यायला सुरवात केली आहे. मात्र, या पिकांमध्ये गळती होणारे पाणी जात असल्याने अडचणी कायम आहेत. त्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. या कालव्याला काही ठिकाणी अस्तरीकरण बाकी आहे. त्यात लोकप्रतिनिधी हे पाणी पुढे पाठवण्यासाठी काम करत आहेत; परंतु मागील भागात काय परिस्थिती आहे. याकडे कोणीच लक्ष देत नाहीत, असा आरोप शेतकरी करत आहेत. त्यामुळे कामे पूर्ण करत कालव्याची स्थिती सुधारावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
आलेल्या प्रमुख अडचणी :
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.