मराठवाड्यात अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान

यंदा एक एकर क्षेत्रात गव्हाची लगवड केली होती. गहू चांगला आला होता. काही दिवसांनी सोंगणी करण्यात येणार होती. मात्र, त्यापूर्वीच गहू पावसामुळे जमिनीवर पडला. - दिलीप आहेर, शेतकरी. ... कोट.. अवकाळी पाऊस मुळावर उठला आहे. अगोदर खरीप आणि आता रब्बी पिकाचे नुकसान झाले. मका पूर्णतः जमिनीवर पडली आहे. नुकसान भरपाई मिळणे गरजेचे आहे. - नारायण बोराडे, शेतकरी.
damage crops due to rainfall in Aurangabad, Jalna, Beed, Osmanabad, Latur districts
damage crops due to rainfall in Aurangabad, Jalna, Beed, Osmanabad, Latur districts

औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यांतील ७६ मंडळांत अवकाळी पावसाने बुधवारी (ता.१) हजेरी लावली. त्यामुळे उशिराने काढनीला आलेल्या रब्बी पिकांसह फळपिकांचे नुकसान झाले. 

एकीकडे ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यात मराठवाड्यातील अनेक भागात अवकाळी पावसाचे सत्रही थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. 

मंगळवारी (ता. ३१) सायंकाळी व रात्री उशिरा बहुतांश भागात पाऊस झाला. बुधवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पाच जिल्ह्यातील ७६ मंडळांत कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. त्यामध्ये औरंगाबाद व लातूर जिल्ह्यातील प्रत्येकी १९, जालन्यातील १७, बीडमधील १८ व उस्मानाबाद जिल्ह्यातील तीन मंडळांचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात पावसाचा जोर सर्वाधिक होता. त्यापाठोपाठ जालन्यातील दोन व बीड जिल्ह्यातील दोन मंडळांत बऱ्यापैकी पाऊस झाला. 

लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांत पाऊस झालेल्या बहुतांश मंडळांत पावसाचे प्रमाण तुरळक व हलक्‍या स्वरूपाचे होते. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड मंडळांत १४.५० ,चिकलठाणमध्ये २६ , चिंचोली २८.५०, तर जालना जिल्ह्यातील हसणाबाद २४, पाचनवडगाव मंडळात १४.५० मिलिमीटर पाऊस झाला. बीड जिल्ह्यातील पाली मंडळात ९.५०, तर पिंपळगाव मंडळात ७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. उर्वरित सर्व मंडळांतील पावसाचे प्रमाण ०.२५ ते ६ मिलिमीटर दरम्यान होते. 

उशिरा पेरणी झालेल्या सर्व रब्बी पिकांची काढणी, मळणी आता जोमाने सुरू आहे. अशातच बरसणारा जोरदार अवकाळी पाऊस या पिकांचे नुकसान करत आहे. जोरदार वादळी वारे वाहत असल्याने फळपिकांचे ही मोठे नुकसान होत आहे. यंदा थोड्या प्रमाणात अंबा दिसतो आहे. त्याचेही पावसामुळे नुकसान झाले. 

मका, गहू, बाजरीचे पिक आडवी

वालसावंगी परिसरात मंगळवारी (ता. ३१) सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. जोरदार वारा आणि मुसळधार पावसामुळे शेतशिवारात विदारक चित्र बघायला मिळाले. मका, गहू, बाजरीचे पिक आडवी झाली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com