वादळी पावसाने रब्बी हंगामातील पिके आडवी

नाशिक : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या पूर्वमोसमी पावसाने इगतपुरी, निफाड, देवळा, सिन्नर, मालेगाव, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, कळवण, सटाणा, दिंडोरी, नाशिक व येवला तालुक्यात हजेरी लावली. त्यामुळे काढणीस आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
Damage to crops due to rainfall in Nashik district
Damage to crops due to rainfall in Nashik district

नाशिक : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या पूर्वमोसमी पावसाने इगतपुरी, निफाड, देवळा, सिन्नर, मालेगाव, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, कळवण, सटाणा, दिंडोरी, नाशिक व येवला तालुक्यात हजेरी लावली. त्यामुळे काढणीस आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

अतिवृष्टीच्या फटक्यानंतर आता पाऊस झाल्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीच्या फेऱ्यात सापडले आहेत. रब्बी हंगामातील काढणीस आलेला गहू, हरभरा यांसह भाजीपाला व काढणीस आलेल्या द्राक्ष पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

कोरोनाच्या भितीमुळे मजुरांमुळे शेतीकामे मंदावली आहे. त्यात या पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सलग तासभर पाऊस झाला. सुरगाणा तालुक्यातील हतगड व बोरगाव परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. पाऊस तुरळक झाला असला तरी शेतकरी चितेत आहेत. इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात वादळ वाऱ्यासह गारपीट झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

बेलगाव तऱ्हाळे, टाकेद, मायदरा, धानोशी, सोनोशी या भागात जोरदार पाऊस झाल्याने गव्हासह, टोमॅटो व इतर भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. खळ्यामध्ये काढून ठेवलेली पिके झाकण्यासाठी मोठी तारांबळ झाली होती. मालेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावल्याने सोंगणी केलेले पीक झाकण्यासाठी कसरत करत होते. 

या पावसामुळे शेतातील गहू, कांदा या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. त्यामुळे कांदा पिकावर परिणाम होऊन कांदा साठवणी योग्य राहणार नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. येवला तालुक्यातील अंदरसूल, नगरसूल, अनकाई, पिंपळगाव जलाल, मानोरी, कातरणी, बोकटे, सायगाव आदी परिसरात पाऊस झाला. गहू सोंगणी, द्राक्ष, हरभरा, कांदा आदी पिके काढण्याचे काम सुरू असून, काढलेली पिके झाकण्यासाठी शेतकरी वर्गाची मोठी धावपळ झाली.

निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांचे पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अगोदरच अतिवृष्टी व महापुरामुळे गोदाकाठ परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यात या पावसामुळे रब्बी हंगामातील पिके व द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. देवळा तालुक्यातील लोहणेर परिसरात सुमारे पाऊण तास चाललेल्या पावसाने कांदा पिकाचे नुकसान केले. तर काढून ठेवलेला कांदा झाकण्यासाठी शेतकरी वर्गाला धावपळ करावी लागली.

आधीच कोरोनाच्या सावटाखाली असलेले शेतकरी आता अवकाळीच्या चिंतेत सापडली आहेत. त्यामुळे जिल्ह्यात ज्या ठिकाणी नुकसान झाले आहे. त्या ठिकाणचे संबंधित विभागाने तत्काळ पंचनामे करून तत्काळ भरपाई देण्याची मागणी होत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com