पुर्ये येथे डोंगराचा भाग खचल्याने भातशेतीचे नुकसान

पुर्ये येथे डोंगराचा भाग खचल्याने भातशेतीचे नुकसान
पुर्ये येथे डोंगराचा भाग खचल्याने भातशेतीचे नुकसान

रत्नागिरी : जिल्ह्यातील संगमेश्‍वर तालुक्यातील साखरपा-पुर्ये येथील डोंगराचा भाग खचल्याने पाच घरांना धोका निर्माण झाला आहे. तेथील कुटुंबांना स्थलांतराच्या सूचना देण्यात आल्या आहेत; मात्र मातीच्या ढिगाऱ्याखाली भातशेतीसह साग, आंबे आणि काजूची झाडेही गाडली गेली.

पुर्ये गावातील धनगरवाडी येथील डोंगर सोमवारी (ता. ५) झालेल्या अतिवृष्टीमुळे खचला. ही घटना पहाटेच्या वेळी घडली. हा डोंगर खचल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मातीच्या ढिगाऱ्‍याखाली भातशेती जाऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्याशिवाय साग, आंबे आणि काजूची झाडेही मातीत गाडली गेली आहेत. विनोद मोरे, धोंडू खंडगाळे, सुरेश शिंदे, सीताराम मोरे, शंकर माळी, सखाराम पवार यांचे नुकसान झाले आहे. याशिवाय या भूस्खलनात विद्युतपुरवठा करणारे ३ पोल जमिनीखाली गेले आहेत. त्यामुळे गेले चार दिवस धनगरवाडी अंधारात आहे.

भूस्खलनामुळे वाडीतील पाच घरांना धोका निर्माण झाला आहे. त्यातील नागरिकांना स्थलांतरचे आदेश देण्यात आले आहेत. या कुटुंबांची राहण्याची व्यवस्था जिल्हा परिषदेच्या शाळेत करण्यात आली आहे. सरपंच अरुण गोरुले, ग्रामसेवक महेश हातफळे यांच्यासह तलाठी, मंडल अधिकारी, कृषी सहायक आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी पाहणी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com