सिंधुदुर्गमध्ये नुकसानीचे पंचनामे सुरू 

​ सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे. घरे, गोठे, दुकाने, इमारतीसह भात शेतीचे मोठे नुकसान पुरामध्ये झाले आहे.
सिंधुदुर्गमध्ये नुकसानीचे पंचनामे सुरू  Damage panchnama started in Sindhudurg
सिंधुदुर्गमध्ये नुकसानीचे पंचनामे सुरू  Damage panchnama started in Sindhudurg

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे. घरे, गोठे, दुकाने, इमारतीसह भात शेतीचे मोठे नुकसान पुरामध्ये झाले आहे. काही भागाला पुराचा मोठा तडाखा बसला आहे. शेतकरी, व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.  जिल्ह्यात गुरुवारी (ता.२२) ढगफुटी सदृश पाऊस झाला आणि संपूर्ण जिल्ह्यात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली. जिल्ह्यातील अनेक बाजारपेठांमध्ये पुराचे पाणी घुसले होते. खारेपाटण, बांदा, कुडाळ, आंबेडकरनगर, मुसरे, कलमठ यासह जिल्ह्यातील विविध भागामधील बाजारपेठांमध्ये पुराचे पाणी शिरले होते. काही शहरांमधील इमारतीचा एक मजला पाण्याखाली गेला होता. या शिवाय खारेपाटण, बांदा, केळुस, मसुरे यासह अनेक ठिकाणी शेकडो एकर भातशेती पाण्याखाली गेली होती. अतिवृष्टीने घरे, गोठ्यांसह कित्येक इमारती कोसळल्या आहेत. पुरामध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. परंतु प्रशासन पुरात अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलविणे, त्यांना प्राथमिक मदत करणे या कामात गुंतलेले होते. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करण्यात आले नव्हते. परंतु गेले दोन तीन दिवस पावसाचा जोर कमी झाला आहे. जनजीवन पूर्वपदावर आले असून, आता प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम हाती घेतले आहे.  गावागावातील तलाठी, कृषी सहाय्यक घरे, गोठे, शेतीच्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करीत आहेत. पुरामुळे खारेपाटण परिसरातील आणि खाडी किनाऱ्याच्या गावांतील शेकडो एकर भातशेती कुजली आहे. पुराचा सर्वाधिक फटका या भागातील भातशेतीला बसला आहे. येथील २५ हून अधिक गावातील शेतीचे नुकसान झाले आहे. या शिवाय केळुस, तुळस, बांदा, मसुरे परिसरातील देखील कित्येक एकर भातशेती कुजली आहे. सलग दुसऱ्या वर्षी पुराच्या पाण्यामुळे भातशेती कुजल्यामुळे या भागातील शेतकरी निसर्गापुढे हतबल आहे. 

वैभववाडीत मुसळधार पाऊस  गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु काही भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. रविवारी (ता. २५) दिवसभर पावसाच्या हलक्या सरी पडल्या. रात्री वैभववाडी तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. तालुक्यात सर्वाधिक ९८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सोमवारी (ता. २६) सकाळपासून पावसाचा जोर पुन्हा कमी झाला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com