डाळिंबाच्या बागांचे पुराच्या पाण्याने नुकसान

डाळिंबाच्या बागांचे पुराच्या पाण्याने नुकसान
डाळिंबाच्या बागांचे पुराच्या पाण्याने नुकसान

वालचंदनगर, जि. पुणे ः इंदापूर तालुक्यातील नीरा नदीच्या काठावरच्या शेतकऱ्यांनी उन्हाळात विकतचे पाणी घेऊन जगविलेल्या डाळिंबाच्या बागांमध्ये नदीच्या पुराचे पाणी घुसले असून, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

इंदापूर तालुक्यामध्ये सलग तीन वर्षे दुष्काळी स्थिती होती. नीरा डाव्या कालव्याचे पाणी शेतकऱ्यांना वेळेमध्ये मिळाले नव्हते. नीरा नदीकाठच्या डाळिंब उत्पादकांनी विकतचे पाणी घेऊन बागा जगवल्या होत्या. सध्या निरवांगी, निमसाखर परिसरातील शेतकऱ्यांचा डाळिंबाच्या बागांना चांगली फळे लागलेली असून, डाळिंबाला उच्चांकी दर मिळत आहे. मात्र, कष्टांनी फुलवलेल्या बागांवरती नीरा नदीच्या पुराचे संकट कोसळले. वीर धरणातून नीरा नदीमध्ये १ पाणी सोडल्याने नदीकाठची पिके पाण्याखाली गेली आहे.

पुराच्या पाण्याने स्वप्नावरती फिरले पाणी या संदर्भात निरवांगी येथील शेतकरी बबन हनुमंत रासकर यांनी सांगितले, की मी अल्पभूधारक शेतकरी असून, नीरा नदीकाठी जमीन आहे. पाऊण एकरामध्ये डाळिंबाची बाग असून, उन्हाळ्यामध्ये विकतचे पाणी घेऊन बाग जगविली. दोन दिवसांपूर्वी नीरा नदीच्या पुराचे पाणी डाळिंबाच्या बागेमध्ये घुसले आहे. चालू वर्षी डाळिंबाच्या झाडांना चांगली फळे आली असून, दरही चांगला असल्याने जास्त पैसे मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र, पुरामुळे सर्व स्वप्नावरती पाणी फिरले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com