परभणी जिल्ह्यात पावणे दोन लाख हेक्टर पिकांचे नुकसान

परभणीः यंदा जून ते ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ५५२ गावांतील २ लाख ५२ हजार ४४१ शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
Damage to two lakh hectares of crops in Parbhani district
Damage to two lakh hectares of crops in Parbhani district

परभणी ः यंदा जून ते ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ५५२ गावांतील २ लाख ५२ हजार ४४१ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. १ लाख ७९ हजार ४४१ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले.

सर्वाधिक फटका कपाशी आणि सोयाबीन या पिकांना बसला आहे. शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १२२ कोटी ६७ लाख ६५ हजार रुपयांच्या निधीची मागणी राज्य शासनाकडे केली आहे, अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात यंदाच्या खरिप हंगामात ५ लाख २३ हजार ८०९ हेक्टरवर पेरणी झाली होती. ऑगस्ट महिन्यात मूग, उडदाची पिके ऐन काढणीच्या अवस्थेत पावसामुळे खराब झाली. त्यानंतर सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात सततचा पाऊस तसेच ३६ मंडळात झालेली अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कपाशी, तूर, ज्वारी, बागायती, फळपीकांचे नुकसान झाले. 

कृषी, महसूल, ग्रामविकास विभागातर्फे पंचनामे अंतिम करण्यात आल्यानंतर परभणी, सेलू, पाथरी तालुक्यातील नुकसान क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील  जिरायती, बागायती, फळपीके मिळून एकूण १ लाख ७९ हजार ९९८ हेक्टर पिकांचे नुकसान झाले. सर्वाधिक नुकसान जिरायती पिकांचे झाले आहे, असे महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com