नांदेडमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे ७३ हजार दावे

नांदेड : जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती उद्भवली. त्यामुळे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे दावे दाखल केले आहेत.
Damaged  73,000 claims of farmers in Nanded
Damaged 73,000 claims of farmers in Nanded

नांदेड : जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती उद्भवली. त्यामुळे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे दावे दाखल केले आहेत. यात ऑफलाइन व ऑनलाइन असे एकूण ७३ हजार दावे दाखल झाले आहेत. आजपर्यंत २० हजार दाव्यावर पंचनामे झाल्याची माहिती कंपनीच्या सूत्राने दिली.

जिल्ह्यात सहा व सात सप्टेंबर रोजी अतिवृष्टी झाली होती. यामुळे गोदावरी नदीसह आसना, मांजरा, लेंडी, कयाधू, पेनगंगा नद्यांना पुर आला होता. या सोबतच अनेक नाल्यांनाही पूर आला होता. या पुरामुळे नदीकाठची पिके पाण्याने खरडून गेली. सखल भागातील शेतात पाणी साचून पिकांचे नुकसान झाले होते.

या बाबत जिल्हा प्रशासनासह कृषी विभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत विमा कंपनीकडे नुकसानीबाबत दावे दाखल करण्याचे आवाहन केले होते. या काळात अनेक शेतकऱ्यांना ऑनलाइन दावे दाखल करता आले नव्हते. यामुळे अशा शेतकऱ्यांनी पीकविमा कंपनी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे ऑफलाईन दावे दाखल करण्यासाठी रांगा लावल्या. 

कंपनीकडून आजपर्यंत ७३ हजार दावे दाखल झाल्याची माहिती मिळाली. कृषी विभाग व महसुल विभागाकडे दाखल झालेल्या दाव्यांची माहिती कंपनीकडे प्राप्त झाली नाही. यामुळे दाव्यांची संख्या वाढेल, असे कंपनीकडून सांगण्यात आले. ७३ हजार दाव्यांपैकी २० हजार ठिकाणी सर्वे झाल्याची माहिती कंपनीच्या सूत्राने दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com