नाशिक जिल्ह्यातील धरणे अद्याप तहानलेलीच

The dams in Nashik district are still thirsty
The dams in Nashik district are still thirsty

नाशिक  : ऑगस्ट महिन्याचा पंधरवडा होऊनही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने अनेक धरणे तहानलेली आहेत. जिल्ह्यातील आठ धरणे निम्मीही भरलेली नाहीत. त्यामुळे या धरणांवर अवलंबून असणाऱ्या रहिवाशांना अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे.

नाशिक जिल्ह्यात २४ धरणे असून, ६५ हजार ८१४ दशलक्ष घनफूट एवढी या धरणांची पाणी साठवण क्षमता आहे. आजमितीस धरणांमध्ये ४१ हजार १९२ मिलीमीटर म्हणजेच ६३ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गंगापूर धरण समूहात चांगला पाऊस झाल्याने येथील एकूण पाणीसाठा ८५ टक्क्यांवर पोचला आहे. आळंदी धरणातील पाणीसाठा १०० टक्क्यांवर पोचला आहे. गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात हलक्या पावसाच्या सरी कोसळत असून, परतीचाही जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून विसर्गही करण्यात आला आहे, अशीच परिस्थिती पालखेड धरण समूहामधील देखील आहे.

इगतपुरी तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने दारणा, भावली या धरणांमधून देखील पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. या धरण समूहात ७६ टक्के एवढा उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. भावली, नांदुर मध्यमेश्वर ही धरणे १०० टक्के भरली असली तरी पालखेड, तिसगाव, मुकणे ही धरणे निम्मीदेखील भरू शकलेली नाहीत. गिरणा खोऱ्याकडेही पावसाने पाठ  फिरविली आहे. गिरणा, पुनद, माणिकपुंज आणि नागासाक्या या धरणांना अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com