अकोला ः गेल्या महिन्यात सतत झालेल्या पावसाने खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. मात्र याच पावसामुळे धरण प्रकल्प यंदा तुडुंब भरले आहेत. त्यामुळे येत्या रब्बीसाठी पाणी मिळण्याची अपेक्षा आहे. खरिपात झालेले नुकसान काहीअंशी रब्बीत भरून काढण्यासाठी शेतकरी प्रयत्न करणार आहेत.
मागील काही वर्षांत अत्यल्प पावसामुळे नागरिकांना कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागला. मागील वर्षी दुष्काळाच्या दाहकतेने पाण्याअभावी उभी पिके करपली होती. गावांना पाणीपुरवठा करणारे जलस्रोत कोरडे पडल्याने पाणीपुरवठा करणाऱ्या टॅंकरच्या संख्येनेही उच्चांक गाठला होता. या वर्षी चांगला पाऊस झाला. कोरड्या दुष्काळाच्या विरुद्ध चित्र तयार झाले. अति पावसामुळे शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाला तोंड द्यावे लागत आहे. या सततच्या पावसामुळे सहा ते सात वर्षांपासून कोरडे पडलेले प्रकल्प शंभर टक्के भरले आहे. या प्रकल्पांतून पाणी ओसंडून वाहत आहे.
अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा, वाण या मोठ्या प्रकल्पांसह मोर्णा, निर्गुणा हे प्रकल्प १०० टक्के भरले. बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा, खडकपूर्णा व पेनटाकळी या मोठ्या प्रकल्पांसह ज्ञानगंगा, मस, कोराडी, पलढग, मन, तोरणा, उतावळी हे मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. वाशीम जिल्ह्यातील प्रकल्पांचीही अशीच स्थिती आहे. यासोबतच लघू प्रकल्प, छोटे-मोठे बंधारे, नाला खोलीकरणाची कामे पावसामुळे काठोकाठ भरलेली आहेत. हे पाणी आता रब्बी व उन्हाळी पिकांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
अशी आहे पाणीसाठा स्थिती
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.