नाशिक : ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’योजनेतून नाशिक परिमंडळात विविध ठिकाणी साकारलेल्या एकूण ६० मेगावॅटच्या सौरप्रकल्पातून एकूण २८ कृषी विद्युत वाहिन्यांद्वारे कृषीपंपांना आता दिवसा वीज मिळण्यास सुरुवात झाली आहे.
महात्मा गांधी यांच्या जयंतीचे निमित्त साधून ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी त्यासंबंधी निर्देश दिले होते. त्यानुसार कार्यान्वित करण्यात आलेल्या राज्यातील ५० कृषिवाहिन्यांमध्ये नाशिक परिमंडलातील २८ कृषी वाहिन्यांचा समावेश आहे.
सद्यस्थितीत शेतीला दिवसा आठ व रात्री दहा तास असा चक्राकार पध्दतीने वीजपुरवठा केला जातो. रात्री, अपरात्री पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याचा विचार करुन शासनाने शेतीला दिवसा वीज देण्यासाठी ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’ ही योजना हाती घेतली.
सौरप्रकल्प उभारण्यासाठी महावितरणच्या उपकेंद्रांपासून जवळ शासकीय अथवा खासगी जागा उपलब्ध होणे आवश्यक आहे. यानुसार जिल्ह्यात ५ ठिकाणी ५ मेगावॉटचे २ असे १० मेगावॉटचे, तर नगर जिल्ह्यात १ ठिकाणी ५ मेगावॉटचे असे एकूण ६ प्रकल्प उभारण्यात आले आहेत. त्याची क्षमता ६० मेगावॅट इतकी आहे. या प्रकल्पातून तयार झालेली वीज महावितरणच्या नजीकच्या उपकेंद्रातून बाहेर पडणाऱ्या कृषी वाहिन्यांना मिळेल.
या उपकेंद्राचा समावेश
नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील टेंभे उपकेंद्रातील ६, मालेगाव तालुक्यातील टिंगरी विद्युत उपकेंद्रातील ५, नांदगाव तालुक्यातील वाहेलगाव विद्युत उपकेंद्रातील ४, येवला तालुक्यातील राजापूर उपकेंद्रातील ४, देवळा तालुक्यातील दहिवड उपकेंद्रातून ५, तर नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील जवळा विद्युत उपकेंद्रातील ४ कृषी विद्युत वाहिन्याचा समावेश आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.