‘एबीएम’ प्रवेश अर्जासाठी तीन ऑगस्टपर्यंत मुदत

‘एबीएम’ प्रवेश अर्जासाठी तीन ऑगस्टपर्यंत मुदत
‘एबीएम’ प्रवेश अर्जासाठी तीन ऑगस्टपर्यंत मुदत

पुणे : राज्यातील कृषी व्यवसाय व्यवस्थापन (एबीएम) पदवी प्रवेशासाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत तीन ऑगस्टपर्यंत ठेवण्यात आली आहे.तसेच, पहिल्या फेरीची निवड यादी १४ ऑगस्टला प्रसिद्ध होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

‘एबीएम’ला ‘व्यावसायिक दर्जा’ देण्यासाठी विद्यार्थ्यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेसमोर जोरदार आंदोलन केले होते. राज्य शासनाने या समस्येबाबत कृषी सचिवांकडून अहवाल सादर करण्याच्या सूचनादेखील दिल्या आहेत. दरम्यान, एबीएम अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची प्रक्रिया २६ जुलैपासून सुरू केली गेली आहे. राज्यातील कृषी विद्यापीठांमार्फत ही प्रक्रिया राबविली जात आहे. एकूण ६०० जागांसाठी यंदा प्रवेश दिले जात आहेत. प्रवेशासाठी www.maha-agriadmission.in  या संकेतस्थळाची मदत विद्यार्थी घेत आहेत. सीईटी परीक्षा अथवा राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेतील गुणांक भारानुसार ‘एबीएम’चे प्रवेश दिले जात आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेशाची सर्व कागदपत्रे शनिवारपर्यंत (ता. ३) अपलोड करावी लागतील. त्यानंतर विविध समस्या असलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन हरकती ७ ते ९ ऑगस्टदरम्यान नोंदविता येतील.

हरकती व एकूण अर्जांचा आढावा घेत अंतिम गुणवत्ता यादी १२ ऑगस्टला प्रसिद्ध होईल. या विद्यार्थ्यांना १५ ते १७ ऑगस्टपासून संबंधित संस्थांमध्ये प्रवेश घेता येतील. २० ऑगस्टला दुसरी निवड यादी प्रसिद्ध होईल व त्याचे प्रवेश २१ ते २२ ऑगस्ट प्रवेश होतील. तिसरी निवड यादी २६ ऑगस्टला प्रसिद्ध होत असून, त्यातील प्रवेश २७ ते २८ ऑगस्टला पूर्ण होतील. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com