गर्दी टाळण्यासाठी शेतमाल विक्रीच्या विकेंद्रिकरणाची गरज

गर्दी टाळण्यासाठी भाजीपाल्याची विक्री बाजार समित्यांमध्येच केंद्रीत न करता, शहरे आणि उपनगरांच्या विविध भागात विकेंद्रिकरण करत शेतमालाच्या थेट विक्रीचे नियोजन करणे गरजेचे आहे. यामुळे गर्दीचे देखील विकेंद्रिकरण करुन, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न उद्घवणार नाही.
गर्दी टाळण्यासाठी शेतमाल विक्रीच्या विकेंद्रिकरणाची गरज
गर्दी टाळण्यासाठी शेतमाल विक्रीच्या विकेंद्रिकरणाची गरज

पुणे : कोरोना विषाणूचा फैलाव आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचार बंदीच्या काळात जिवनावश्‍यक वस्तुंचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न होत आहेत. मात्र जिवनावश्‍यक वस्तुंमधील भाजीपाला खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याचे चित्र आज (ता.२४) राज्याने पाहिले. गर्दी टाळण्यासाठी भाजीपाल्याची विक्री बाजार समित्यांमध्येच केंद्रीत न करता, शहरे आणि उपनगरांच्या विविध भागात विकेंद्रिकरण करत शेतमालाच्या थेट विक्रीचे नियोजन करणे गरजेचे आहे. यामुळे गर्दीचे देखील विकेंद्रिकरण करुन, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न उद्घवणार नाही, असे मत व्यक्त होत आहे. 

सध्या भाजीपाल्याच्या विक्रीची व्यवस्था ही बाजार समित्यांमध्ये केंद्रीत आहे. साथीच्या रोगांच्या फैलाव रोखण्यासाठी संचारबंदी, जमावबंदी हि अनिश्‍चित काळासाठी असताना, शहरातील भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची बाजार समितीमधील आणि परिसरात गर्दी टाळण्यासाठी शहरे आणि उपनगरांच्या विविध भागात मैदाने, शाळा या परिसरात भाजीपाला विक्रीसाठी पाठविण्याची व्यवस्था करणे आता आवश्यक झाले आहे. बाजार समितीमध्ये शेतमालाची सर्व वाहने न आणता शहराच्या विविध भागात विविध भाजीपाल्याची दोन-चार ट्रक पाठवुन विक्री करण्याची व्यवस्था केल्या गर्दी नियंत्रणावर फायदा होईल, असे मत व्यक्त होत आहे. 

पुणे शहरात गुलटेकडी येथील बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.२४) सुमारे ५०० ट्रक भाजीपाल्यासह कांदा बटाटा आणि फळांची आवक झाली होती. यावेळी मोठ्याप्रमाणावर गर्दी झाल्याने ग्राहकांना खरेदीसाठी रांगेने सोडण्याची वेळ बाजार समिती प्रशासन आणि पोलीस प्रशासनावर आली. कोरोनाचा प्रभावाचा अंदाज नसल्याने राज्यात आणखी काही दिवस राहणार असल्याच्या शक्यतेने दोन दिवसांआड बाजार समितीमध्ये येणारी शेतमालाची वाहने पुणे शहरातील शिवाजीनगर पोलीस ग्राऊंड, हडपसर येथील एसआरपीएफचे ग्राऊंड, सिंचननगर (रेंजहिल्स) येथील कृषी महाविद्यालयाचे पटांगण, महानगरपालीकांच्या भाजी मंडई, शहरातील विविध शाळांचा परिसर आदि ठिकाणी दोन-दोन, चार-चार संख्यने पाठविण्यास प्राधान्य दिल्यास नियोजना उपयुक्त ठरेल, असे मत व्यक्त केले गेले. मात्र, यासाठी पणन मंडळ, पोलीस, बाजार समिती, महानगरपालीका, नगरसेवक, वॉर्ड आॅफिसर यांच्या समन्वयाने शहरातील भाजीपाला पुरवठा सुरळीत करणे शक्य होणार आहे.     

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com