'शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय लवकरच'

केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह
केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह

नवी दिल्ली  : समस्याग्रस्त शेती क्षेत्र आणि शेतकऱ्यांसाठी येत्या काही आठवड्यात केंद्र सरकार विशेष घोषणा करणार असल्याचे संकेत केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी दिले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्राच्या संकेतांकडे देशभरातील शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. 

केंद्रीय कृषी मंत्रालयाने, ‘अल्प व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांच्या उत्पन्न तूट’संदर्भात बनविलेल्या कॅबिनेट प्रस्तावात विविध उपाय सूचविण्यात आले आहेत. यात पीककर्जासाठी आर्थिक पॅकेजसह व्याजमाफी आदींचा अंतर्भाव असल्याचे सूत्रांनी सांगितले. पंतप्रधान कार्यालय, कृषी आणि अर्थ मंत्रालय आणि निती आयोग यांच्या सतत्याच्या बैठकांनंतर कॅबिनेट प्रस्तावास अंतिम स्वरुप देण्यात आले आहे.  

शेती क्षेत्रासाठी मोठ्या पॅकेजबाबत केंद्रीय मंत्री राधामोहनसिंह यांना विचारले असता, ते म्हणाले, ‘‘जेव्हा त्याची घोषणा होईल, तेव्हा ते सर्वांनाच ठाऊक होईल. प्रत्येक वर्षी बजेटपूर्व अथवा अर्थसंकल्पात काहीना काही शेतकऱ्यांसाठी नव्या घोषणा केल्या आहेत. निश्‍चितच यंदाही शेतकऱ्यांसाठी काहीना काहीतरी असेल.’’  

लहान शेतकऱ्यांच्या कृषी व्यवसाय संघाच्या रजत महोत्सवी समारंभात नुकतेच केंद्रीय कृषिमंत्री सिंह म्हणाले, की कृषी क्षेत्र नेहमीच सरकारच्या प्राधान्यक्रमावर राहिले आहे. पंतप्रधान स्वत: सर्व कृषी योजनांचा आढावा घेत असतात. परिणामी शेतकरी समाजाला अनेक योजना लाभदायक ठरत आहेत. गेल्या साडेचार वर्षांच्या काळात राष्ट्रीय लोकशाही आघाडीने प्रत्येक वर्षी शेतकरी समाजासाठी काहीना काही नव्या घोषणा केल्या आहेत. संपूर्ण आत्मविश्‍वासाने आम्ही पुढे जात आहोत. डिसेंबरअखेरपर्यंत प्रत्येक शेती क्षेत्राला पाणी आणि वीज देण्यात येणार आहे.   ...शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट : जेटली मुंबई   : केंद्रातील भाजप सरकारला शेतकऱ्यांसाठी उत्पन्न आधार योजना राबविण्याच्या विविध वृत्तांच्या पाश्‍वर्भूमीवर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले, की देशात अन्नधान्याच्या अतिरिक्त उत्पादन झाल्याचा प्रतिकूल परिणाम अन्न दर आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न घसरणीवर झाल्याने धोरण बदलण्याचा दबाव निर्माण झाला आहे.    लवकरच मोठा निर्णय : मस्त नवी दिल्ली   :  शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी केंद्र सरकार लवकरच खूप मोठा निर्णय घेणार आहे, अशी माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्याने शुक्रवारी दिली. भारतीय जनता पक्षाच्या शेतकरी विभागाचे अध्यक्ष वीरेंद्र सिंह मस्त म्हणाले, की ग्रामीण विकास आणि कृषी क्षेत्रासाठी सरकारने अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. लवकरच शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी सरकार मोठा निर्णय घेणार आहे. भाजपाचे शेतकरी विभागाचे गोरखपूर (उत्तर प्रदेश) येथे पुढील महिन्यात राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे. यात २४ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करतील, असे श्री. मस्त म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com