सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे टॅंकरच्या संख्येत घट

सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे टॅंकरच्या संख्येत घट
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे टॅंकरच्या संख्येत घट

सोलापूर  : गेल्या वर्षीच्या दुष्काळानंतर यंदा शेवटच्या टप्प्यात जिल्ह्यातील विविध भागांत पावसाने समाधानकारक हजेरी लावली. त्यामुळे ६०० वरून आता टॅंकरची संख्या १३४ एवढी झाली आहे. मात्र, करमाळ्यात सर्वाधिक ४५ टॅंकरद्वारे ४३ गावे अन्‌ ३५४ वाड्या-वस्त्यांना, तर माढ्यात ३० टॅंकरद्वारे २४ गावे व २९ वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. 

जिल्ह्यात मागच्या वर्षी पाऊस कमी झाल्याने पाणी पातळीत मोठी घट झाली. विहिरी, कूपनलिका कोरड्या असल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते. जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन करून जिल्हाभर आवश्‍यक त्या ठिकाणी टॅंकर सुरू केले. 

दरम्यान, मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने सुमारे ४०० टॅंकर कमी झाले. जिल्ह्यात सद्य:स्थितीत एकूण टॅंकर १३४  सुरू आहेत. त्यात १२१ गावांना पाणीपुरवठा होतो आहे. त्यात टॅंकर असलेल्या वाड्या-वस्त्यांची संख्या ४१९ इतकी आहे. सद्य:स्थितीत उत्तर सोलापूर व बार्शी तालुक्‍यांत प्रत्येकी १९, दक्षिण सोलापुरात १५, अक्‍कलकोट येथे एक, माढ्यात ३०, करमाळ्यात ४५, तर मोहोळ तालुक्‍यात पाच टॅंकर सुरू असल्याची माहिती टंचाई शाखेकडून देण्यात आली. 

मागच्या वर्षीचा टंचाई आराखडा सुमारे ३७ कोटींचा असतानाही चार ते पाच कोटींचा अतिरिक्‍त खर्च झाला आहे. त्यामुळे आगामी टंचाई आराखडा वाढीव रकमेचा असेल, असा अंदाजही व्यक्‍त करण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com