जळगाव जिल्ह्यात टॅंकरच्या संख्येत घट

जळगाव जिल्ह्यात टॅंकरच्या संख्येत घट
जळगाव जिल्ह्यात टॅंकरच्या संख्येत घट

जळगाव ः जिल्ह्यात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने गिरणा, हतनूर, वाघूर आदी प्रकल्पांमध्ये चांगला जलसाठा झाला आहे. गिरणा पट्ट्यासह अमळनेर, पारोळा भागांतील अनेक गावांमधील टंचाई कमी झाली आहे. परिणामी, टॅंकरची संख्या घटली असून, फक्त १८ टॅंकर सध्या सुरू आहेत.  जुलैअखेर जिल्ह्यात ८२ गावांसाठी ७५ टॅंकर सुरू होते. मे व जूनमध्ये तीव्र उन्हाळ्यामुळे पाणीटंचाई वाढली. दोनशेवर टॅंकरची संख्या पोचली होती. त्यावर जिल्हा प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना केल्या. उन्हाळ्यात अनेक गावांना दहा ते पंचवीस दिवसांआड पाणीपुरवठा केला गेला. जूनमध्येही पावसाने तब्बल तेवीस दिवस ओढ दिली. यामुळे दुष्काळाची चिन्हे होती. जिल्हा प्रशासनाने महसूल अधिकाऱ्यांना पर्यायी पाण्याचे स्रोत शोधण्याचे आदेशही काढले होते. जूनअखेर पाण्याच्या उपाययोजना बंद कराव्यात लागतात. मात्र, पाऊस नसल्याने शासनाने पाणीटंचाईच्या उपाययोजना चांगला पाऊस होईपर्यंत सुरूच ठेवण्याचे आदेश दिले. नंतर पावसाने हजेरी लावली. त्यात जुलैमध्ये काहीसा खंड पडला. आता श्रावणात बऱ्यापैकी पाऊस झाला असून, वार्षिक सरासरीच्या ६६ टक्के पाऊस पडला आहे. जळगाव जिल्ह्यातही काही तालुक्‍यांत अतिवृष्टी झाली. मध्य प्रदेश व विदर्भातील पावसाने तापी नदीला दोन वेळेस मोठा पूर आला. यामुळे भुसावळ विभागातील बहुसंख्य गावांतील पाणीटंचाई मिटली आहे. परिणामी, टॅंकरची संख्या कमी झाली आहे, अशी माहिती मिळाली. टॅंकरची स्थिती ः भुसावळ तालुका ३, बोदवड १, चाळीसगाव ६, भडगाव २, अमळनेर ६. अमळनेर तालुक्‍यातील नऊ गावांमध्ये टॅंकर सुरू आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com