साताऱ्यात पावसामुळे टॅंकरच्या संख्येत घट

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सातारा : जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे टॅंकरच्या संख्येत घट झाली आहे. सध्या जिल्ह्यातील पाच तालुक्‍यांतील २३ गावे व ७२ वाड्यावस्त्यावर १८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

जिल्ह्यातील माण, खटाव, कोरेगाव, खंडाळा, कराड या दुष्काळी तालुक्‍यांत पावसाचे आगमन झाले आहे. यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी सुरू असलेल्या टॅंकरच्या संख्येत घट झाली आहे. जावली, पाटण, सातारा तालुक्‍यांतील टॅंकर पूर्ण बंद करण्यात आले आहेत.

सध्या माण तालुक्‍यात पाच टॅंकरद्वारे आठ गावे व ४२ वाड्यावस्त्यांवर, खटाव तालुक्‍यात सहा टॅंकरद्वारे सात गावे व २८ वाड्यावस्त्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. कोरेगाव तालुक्‍यात पाच टॅंकरद्वारे सहा गावे, खंडाळा तालुक्‍यात एका टॅंकरद्वारे एका गावात तर कराड तालुक्‍यात एका टॅंकरद्वारे एक गाव व दोन वाड्यावस्त्यांवर पाणीपुरवठा केला जात आहे. पश्‍चिम भागाच्या तुलनेत पूर्वेकडील दुष्काळी तालुक्‍यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने अजूनही २३ गावे व ७२ वाड्या-वस्त्यावर १८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

संरक्षित पाणीसाठ्यासाठी प्रशासनाकडून जिल्ह्यातील १६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये माण ७, खटाव १, कोरेगाव ६, फलटण तालुक्‍यातील दोन विहिरींचा समावेश आहे, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com