निर्जलीकरण प्रक्रियेमध्ये फळे, पालेभाज्यांमधून पाण्याचे प्रमाण विविध प्रक्रिया करून काढले जाते. फळे,पालेभाज्यांचा साठवण कालावधी वाढविण्यासाठी निर्जलीकरण पद्धतीचा वापर फायदेशीर ठरतो. फळे व भाजीपाला काढणीनंतर काही काळातच त्यांचा ताजेपणा कमी होऊन खराब होण्यास सुरवात होते. त्यामुळे प्रक्रिया करून त्यांची गुणवत्ता टिकविणे आवश्यक आहे. फळे व भाजीपाला नाशवंत स्वरूपाचा असल्याने त्यांच्या काढणीनंतर त्वरित विक्री करावी लागते. हंगामात फळे व भाजीपाल्यांची आवक जास्त झाल्यास त्यांचे दर कमी होतात. शेतमालावर प्रक्रिया केल्यास किमतीच्या चढ उतारावर नियंत्रण ठेवता येते. याशिवाय हंगामी भाज्या ग्राहकांना बिगर हंगामात उपलब्ध होऊ शकतात. निर्जलीकरण प्रक्रियेमध्ये फळे, पालेभाज्यांमधून पाण्याचे प्रमाण विविध प्रक्रिया करून काढले जाते. फळे, पालेभाज्यांचा साठवण कालावधी वाढविण्यासाठी निर्जलीकरण पद्धतीचा वापर केला जातो. पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने त्यामध्ये सूक्ष्मजीवाणुंची वाढ होत नाही.
निर्जलीकरणाचे प्रकार
निर्जलीकरण पद्धतीची निवड
प्रक्रिया -
माल धुणे, वाळविणे व त्याचे काप करणे (फळे आणि पालेभाज्यांच्यानुसार) | ब्लांचींग, पाश्चरायझेशन, कुकिंग (आवश्यकतेनुसार) | शुगर सिरप (४० ते ६० ब्रिक्स) मध्ये बुडवून ठेवणे (आवश्यकतेनुसार) | साफ करून वाळविणे | आवश्यक आकारामध्ये पॅक करणे | साठवणूक | मागणीनुसार बाजारात विक्रीसाठी पाठविणे
आवश्यक यंत्रसामुग्री
इतर
टीप - पुढील भागात आपण निर्जलीकरण पद्धतीबद्दल माहिती घेणार आहोत. संपर्क - राजेंद्र वारे, ९८८१४९५१४७ ( लेखक प्रकल्प उभारणी, तंत्रज्ञान, विक्री, व्यवस्ठापन व कायदेशीर बाबी इ. विषयांतील तज्ञ आहेत.)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.