दिल्ली सरकार करणार नाशिक जिल्ह्यात कांदा खरेदी

कांदा
कांदा

नाशिक : दिल्लीमध्ये ग्राहकांना रास्त दरात कांदा उपलब्ध करून देण्यासाठी केजरीवाल सरकारकडून किरकोळ विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहेत. या केंद्रावर कांदा उपलब्ध करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातून खरेदी करण्याचा निर्णय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतला असल्याची माहिती आम आदमी पक्षाचे राज्य प्रवक्ते अभिजित गोसावी यांनी दिली.   नाशिक जिल्ह्यातून कांदा खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारच्या यंत्रणेबरोबर समन्वय साधण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. याबाबत विशेष बाब म्हणजे दोन उच्चस्तरीय अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ नाशिकला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.  हे शिष्टमंडळ येत्या आठवड्यात नाशिक जिल्ह्यात कांद्याची उपलब्धता, गुणवत्ता व खरेदीबाबत दौरा करणार आहे. दिल्ली सरकार ४०० रेशन दुकाने आणि मोबाईल व्हॅनद्वारे दिल्लीमध्ये नागरिकांना २३.९ रुपये प्रतिकिलो दराने कांदा उपलब्ध करून देत आहे. कांदाप्रश्‍नी शेतकरी उत्पादक व सामान्य ग्राहक या दोघांचेही हित कसे साधावे हे महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्याकडून शिकण्याची गरज आहे. जर हे दिल्लीत होऊ शकते, तर मग आपल्या महाराष्ट्रात का नाही, असा सवाल अभिजित गोसावी यांनी उपस्थित केला आहे. 

‘‘दिल्लीच्या केजरीवाल सरकारच्या या निर्णयामुळे नाशिकच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही फायदाच होणार आहे; तर दुसरीकडे अनुदान स्वरूपात होणाऱ्या कांदा विक्रीमुळे सामान्य ग्राहकालाही कांदादिलासा मिळत आहे. सरकारची नियत चांगली असली, की उत्पादक शेतकरी व सामान्य ग्राहक यांच्यात योग्य समन्वय साधून दोघांचेही हित साधता येते. हेच या निर्णयावरून दिसून येत आहे,’’ अशी प्रतिक्रिया आपचे विशाल वडघुले यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com