डाळिंबाच्या विम्याचे निकष बदलण्याची मागणी

सोलापूर ः डाळिंबाच्या फळपीक विम्यासाठी घातलेल्या जाचक अटी आणि निकष बदला, अशी मागणी सोलापूर दौऱ्यावर आलेले असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत ठोंगे पाटील यांनी केली आहे.
Demand for change in pomegranate insurance criteria
Demand for change in pomegranate insurance criteria

सोलापूर ः डाळिंबाच्या फळपीक विम्यासाठी घातलेल्या जाचक अटी आणि निकष बदला, अशी मागणी सोलापूर दौऱ्यावर आलेले असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत ठोंगे पाटील यांनी केली आहे.

श्री. ठाकरे हे आषाढी वारीनिमित्त विठ्ठलाच्या शासकीय महापूजेसाठी पंढरीत आले असताना ठोंगे-पाटील यांनी श्री. ठाकरे यांना हे निवेदन दिले आहे. कृषी विभागाने हवामानाधारित फळपीक विमा योजनेचे निकष नुकतेच जाहीर केले आहेत. मात्र, ते निकष फळबागा असलेल्या विशेषतः डाळिंब बागा असलेल्या शेतकऱ्यांच्या मुळावर येणारे आहेत. या निकषांमुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार नाही. तेव्हा ते निकष बदलण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या संकटात सापडला आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी बियाणे उत्पादक कंपन्यांनी बियाण्यांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली आहे. ती लूट थांबविण्यात यावी. जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी अद्यापही उसाची एफआरपीची रक्कम दिलेली नाही. ती रक्कम देऊन शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यात यावा. पंतप्रधान पीकविमा योजनेचे पैसे अद्यापही शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. पीकविमा मंजूर होऊनही हे पैसे मिळत नाहीत, अशी खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com