कांदा उत्पादकांना थेट मदत करण्याची मागणी

कांदा उत्पादकांना थेट मदत करण्याची मागणी
कांदा उत्पादकांना थेट मदत करण्याची मागणी

येवला, जि. नाशिक : कांदाशेती मोठ्या संकटात आहे. शेतकरी आर्थिक अडचणींतून जात आहेत. शासनाने कांदा उत्पादकांना थेट मदत करून ही शेती वाचवावी, अशी मागणी शेतकरी संघटनेने तहसीलदार रोहिदास वारुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या भावाने नीचांक गाठला आहे. १०० ते ४०० रुपये व सरासरी २५० रुपये प्रतिक्विंटल भाव कांद्याला मिळाला. दर कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.

केंद्र आणि राज्य सरकार पाच राज्यातील निवडणूक प्रचारात व्यस्त आहे. राममंदिर, आरक्षण विषयात पक्ष, संघटना सहभागी आहेत. त्यामुळे शेतीमाल भावाचा प्रश्न बाजूला पडला आहे. शेतकऱ्यांनी विकलेल्या मालावर त्वरित अनुदान जाहीर करावे, फरकाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी शेतकरी संघटनेची मागणी आहे.

मागील वर्षी कांद्याला चांगला भाव मिळाला होता. आलेला पैसा चाळ बांधण्यात खर्च झाला. आठ महिने कांदा साठवून ठेवला. मात्र मातीमोल भावाने तो विकण्याची वेळ शासनाच्या धोरणामुळे आली असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे. केंद्र आणि राज्य शासनाने आयात-निर्यात धोरणात सुधारणा करून शेतकऱ्यांना योग्य भाव मिळवून द्यावा आणि बाजारात नव्याने येत असलेल्या नवीन लाल कांद्यालाही भाव मिळण्यासाठी उपाययोजना करावी. शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन, तुषार सिंचन केले. टॅकरने पाणी विकत घेऊन कांदा जगावला. मात्र त्याला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये सरकारबाबत नाराजी आहे.

या प्रसंगी शेतकरी संघटनेचे नेते संतू पाटील झांबरे, बापूसाहेब पगारे, अरूण जाधव, योगेश सोमवंशी, बाळासाहेब गायकवाड, सुभाष सोनवणे, विठ्ठल वाळके, हरिभाऊ पवार, योगेश गायकवाड, संजय पाटील, मधुकर देशमुख, सतीश पाटील आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com